अकुलखेडा व चुंचाळे गटात गाव चलो अभियान संपन्न अकुलखेडा व चुंचाळे गटातील आडगाव, नरवाडे, वडती, बोरखेडा, नारद, खराद, अंबाडे, या ठिकाणी मा. जि...
अकुलखेडा व चुंचाळे गटात गाव चलो अभियान संपन्न
अकुलखेडा व चुंचाळे गटातील आडगाव, नरवाडे, वडती, बोरखेडा, नारद, खराद, अंबाडे, या ठिकाणी मा. जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ग्रामीण रावसाहेब पाटील यांच्याकडून गाव चलो अभियान संपन्न करण्यात आले.
( संपादक: हेमकांत गायकवाड )
गावागावात जाऊन भाजप सरकारचा विविध योजनांची दिली माहीती मा. यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेद्र मोदीजी यांना पुन्हा सरकार स्थापन होणार आहे.
चोपडा तालुक्यातील अक्कलखेडा चुंचाळे गटात जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन गाव चलो अभियान संपन्न केले भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' सुरू झाले आहे. विविध घटकांशी संवाद साधला. व विचारांची देवाणघेवाण करून, या अभियानाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या वेळी गजेंद्र पांडुरंग सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य, रावसाहेब पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ग्रामीण, तसेच परेश धनगर उपसरपंच नरवाडे बुथ प्रमुख, मिलिंद वाणी बूथ प्रमुख वडती, समाधान पाटील बूथ प्रमुख विष्णापूर, प्रवीण पाटील बूथ प्रमुख बोरखेडा, या गावात सरकारी योजनेतील लाभार्थी,अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, विद्यार्थी व खेळाडू, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
आडगाव येथील ताराचंद तुकाराम पाटील, रघुनाथ गिरधर पाटील,राजेंद्र ओंकार पाटील, कैलास रामकृष्ण पाटील, चंद्रशेखर प्रकाश पाटील हे उपस्थित होते.
वडती येथील सुरेश पाटील, जगन कोळी, दिलावर पिंजारी, रवींद्र कंडारी, रवींद्र सूर्यवंशी, सोनु धनगर,भावसिंग पाटील, गोरख पाटील, अण्णा पाटील, भैय्या कोळी, श्रीराम कोळी, नारद, खरद, आंबाळे, येथील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
No comments