Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वसमत येथील जरांगे पाटील यांच्या बैठकीदरम्यान दाखल झालेल्या गुन्हयामध्ये मा. उच्च न्यायालयामध्ये सरकार तसेच फिर्यादीस बजावली नोटीस

  वसमत येथील जरांगे पाटील यांच्या बैठकीदरम्यान दाखल झालेल्या गुन्हयामध्ये मा. उच्च न्यायालयामध्ये सरकार तसेच फिर्यादीस बजावली नोटीस ________...

 वसमत येथील जरांगे पाटील यांच्या बैठकीदरम्यान दाखल झालेल्या गुन्हयामध्ये मा. उच्च न्यायालयामध्ये सरकार तसेच फिर्यादीस बजावली नोटीस

____________________________________

गोकुळसिंग राजपुत (छ्त्रपती संभाजीनगर)

(संपादक: हेमकांत गायकवाड)

दिनांक १२ मार्च २०२४ रोजी वसमत येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे  पाटील यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही सदरील संवाद बैठक शांततेत पार पडल्यानंतरही वसमत ग्रामीण पोलीस यांनी रात्री ११ वाजून २७ मिनिटाला तसेच वसमत शहर पोलिस यांनी ११ वाजून ३०मिनिटाला मराठा बांधवांवर मोटार वाहन कायदा कलमे व तसेच मुंबई पोलीस कायदा आणि भारतीय दंड संहिता तसेच जिल्हाधिकारी यांची प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश या कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आलेली होती.


सदरील गुन्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना देखील आरोपी करण्यात आलेले होते. त्याच सोबत दोन्ही गुन्ह्यांमध्ये १९ आणि ११ समाज बांधवांना नावानिशी आरोपी करण्यात आले होते. आणि त्यानंतर सदरील आरोपींविरुद्ध चॅप्टर केसेस देखील दाखल करण्यात आली होती. 


एकाच घटनेचे दोन गुन्हे दाखल केले असल्याकारणाने आणि कुठलीही समाजविघातक कृती झाली नसल्याकारणाने सदरील गुन्ह्यांमध्ये मराठा समाज बांधव यांनी ॲड.बाळासाहेब मगर पाटील यांच्यामार्फत  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  गुन्हा रद्द करणे कामी फौजदारी याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेची प्रथम सुनावणी दिनांक: २३ एप्रिल २०२४ रोजी झाली असता मंगेश पाटील यांच्या  द्वयी न्यायपीठापुढे असे मांडण्यात आले की, सदरील दोन्ही गुन्हे हे किरकोळ स्वरूपाचे असून यामध्ये कुठलेही गंभीर गुन्ह्याची  नोंद नसून तसेच प्रथमदर्शनी नाव घेतलेल्या मराठा समाज बांधवांनी प्रत्यक्ष कुठलाही गुन्हा केल्याबाबत स्पष्टपणे नमूद नाही. किरकोळ नियमांचे उल्लंघनाबाबत मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच सदरील दिवशी कुठलीही समाज विघातक घटना घडली नसून कुणालाही त्रास, मारहाण व इजा झालेली नाही. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक शांततेत पार पडली व याबाबतीत इतर कुणाची तक्रार देखील यंत्रणेसमोर नसताना यंत्रणेने जाणून-बुजून सदरील गुन्हे दाखल केलेले आहेत. उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकूण सरकार पक्ष तसेच फिर्यादी यास नोटीस बजावून प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवले आहे. प्रकरणात वसमत तालुका येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने ॲड. बाळासाहेब मगर पाटील यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.

No comments