Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष- विक्रम गायकवाड

  आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष- विक्रम गायकवाड शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथ...

 आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष- विक्रम गायकवाड


शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती 

 नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- अडावद प्रतिनिधी

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

येत्या काळात आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी कर्मचाऱ्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता.जळगाव येथील अभियंता भवन येथे सदर मेळवा आयोजीत करण्यात आला होता.शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्याला लाभली होती.आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची  आदिवासी विकास मंत्र्यांनी सतत अवहेलना केली असून कर्मचाऱ्यांना त्यांनी जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.आदिवासी विकास खात्याचे मंत्री हे  मुख्यमंत्र्यांनी आताच निवडणुकीत दरम्यान दिलेल्या आश्वासनाकडे पाहतील तरी का? यावर गायकवाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.ते पुढे म्हणाले या मंत्र्यांनी नेहमीच सत्तेवर आल्यावर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अशी शाळेची वेळ लागू केली आहे. यापूर्वीची ११ते ५ ही वेळ व्हावी ही प्रामुख्याने मागणी सातत्याने कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे.तसेच ०८ जून २०१६ चा "काम नाही वेतन नाही"हा शासन निर्णय रद्द करणे,शैक्षणिक निकालाबाबत वेतनवाढी रोखने,पहारेकरी यांना नियमित वेतन श्रेणी प्रदान करणे,विशेष बाब म्हणून ११२२ कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे,नक्षलग्रस्त/आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक शिक्षकांप्रमाणे सर्वच माध्यमिक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांना ४८०० ग्रेड वेतन मिळणे, डी.सी.पी.ए.स धारकांचे एन.पी.एस.खाते वर्ग करणे,प्रतिवर्षाचे वेतनाचे हिशोब कर्मचाऱ्यांना पावती स्वरूपात मिळणे,२००५ पूर्वी व नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना  लागू करणे,वसतीगृह विभाग वेगळा करणे यावर संघर्ष सुरूच आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी शासनमान्य विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेचे राज्यअध्यक्ष राजेश पाटील यांनी संघटना करीत असलेल्या कामकाजाचा आढावा मांडला.संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.यावेळी मंचावर प्रकल्प अध्यक्ष प्रशांत बोदवडे,राज्य कार्यकारणी सदस्य चंद्रकांत पाटील,विभाग सदस्य देवेंद्र चौधरी,अविनाश अहिरे,जिल्हा महिला आघाडी प्रमुख शबाना तडवी,चारुलता जावळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन गजानन पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक उदय पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments