Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मायना घाटा,मंगळवारनी बंदी आणि मरीमायना फेरा.

  मायना घाटा,मंगळवारनी बंदी आणि मरीमायना फेरा. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक परंपरा ह्या पाळल्या जातात ( संपादक  :- हेमकांत गायकवाड)   पुर...

 मायना घाटा,मंगळवारनी बंदी आणि मरीमायना फेरा.

पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक परंपरा ह्या पाळल्या जातात

(संपादक  :- हेमकांत गायकवाड)

  पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक परंपरा ह्या पाळल्या जातात.त्यातीलच एक म्हणजे आषाढ महीण्याच्या शेवटच्या मंगळवारी होणारा मरी आईचा घाटा.या दिवशी काही गावात बोकड कापलं जातय तर काही गावात उडीदाची मसाले दाळ व बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात.व देवीचा प्रसाद म्हणून सर्व गावकरी एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेतात.विशेष म्हणजे या दिवशी व यानंतर श्रावण महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी गावात बंदी पाळली जाते.म्हणजे या दिवशी कुणीही शेतात कामाला जात नाही.किंवा गुरांना चारा देखील आणायला जात नाहीत.पुर्वी या दिवशी पिठाची गिरणी सुद्धा बंद ठेवली जायची.तव्यावर भाकरी बनवण्या ऐवजी एकोटी(मातीचे एक भांडे) यावरच भाकरी बनवायचे पण आता  पिठाची गिरणी व एकोटी वरील भाकरी याला मात्र यातून मोकळीक दिली गेलेली दिसते.या दिवशी पारंपारीक प्रथेनुसार मरी आईचे भक्त व अनेक भाविक मामलदा,चुंचाळे,चौगाव,कर्जाने व क्रुष्णापूर गावात वाजत गाजत फेरी मारत असतात. मरी आईची फेरी गावातून गेली तर गावातील रोगराई कमी होते अशी या भागातील लोकांची भावना आहे.गेली शेकडो वर्षे ही परंपरा चालत आली आहे.तसेच श्रावणच्या शेवटच्या मंगळवारी म्हणजे शेवटच्या बंदीला गावात तमाशाचे आयोजन केले जाते.जिल्ह्यात इतरस्त्र कुठेही हा प्रकार दिसत नसला तरी मामलदा,चुंचाळे,चौगाव,कर्जाने व क्रुष्णापूर या गावात ही बंदी मजूर,शेतकरी,सालगडी स्वयंप्रेरणेने आजही पाळत असतात.

                       *शब्दांकन *

विश्राम तेले चौगाव 


No comments