Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यार्थिनींच्या सुरक्षेची योजना शाळा प्रशासनाने तत्काळ आखावी मनसेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

  विद्यार्थिनींच्या सुरक्षेची योजना शाळा प्रशासनाने तत्काळ आखावी मनसेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन यावल, (प्रतिनीधी ) (संपादक :- हेमकांत ग...

 विद्यार्थिनींच्या सुरक्षेची योजना शाळा प्रशासनाने तत्काळ आखावी

मनसेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन


यावल, (प्रतिनीधी )

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

राज्यात : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, विद्यार्थिनींच्या पालकांच्या मनात आपल्या मुलींच्या सुरक्षेततेबदल भीतीचे वातावरण निर्माण झाले. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील मनसेच्या वतीने यावल व परिसरातील शाळा प्रशासनाने शासनाच्या आदेशाचे तत्काळ पालन करीत विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयीची योजना आखावी, अशी मागणी मनसेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्यासह विविध ठिकाणी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

मागील आठवड्यात बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आली. दरम्यान शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांना व प्रशासनास शालेय शिक्षण विभागाला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजनांचा अध्यादेश तातडीने काढवा लागला असून, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदधिकारी, कार्यकर्त व अंगीकृत संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध शाळा व शाळा प्रशासनास शासनाच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षतेविषयी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यावल यांनी तत्काळ उपाययोजना आखावी, अशी निवेदनात म्हटले आहे, की मागणी मनसेने केली आहे.

No comments