..........घरावर तुळशीपत्र ठेवून - नोकरी शेती व्यवसाय बाजूला सारून...... वर्षभरात तब्बल ७ वेळा आंदोलन उपोषण करणारा ध्येयवेडा कार्यकर्ता- जगन...
..........घरावर तुळशीपत्र ठेवून - नोकरी शेती व्यवसाय बाजूला सारून......
वर्षभरात तब्बल ७ वेळा आंदोलन उपोषण करणारा ध्येयवेडा कार्यकर्ता- जगन्नाथ बाविस्कर
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- भारतीय राज्यघटनेच्या ३४२ व्या कलमान्वये राज्यातील आदिवासी कोळी लोकांना कोळी नोंदीनुसार टोकरेकोळी, महादेवकोळी, मल्हारकोळी (अनु.जमाती) चे जातप्रमाणपत्र मिळावे, यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी एका वर्षात तब्बल ७ वेळा आंदोलन, उपोषण, सत्याग्रह, मोर्चा काढून आपल्या कोळी जमातबांधवांना शेकडों दाखले मिळवुन दिलेले आहेत.
त्यांनी प्रथमतः अमळनेर कोळी समाज पंच मंडळाच्या सहकार्याने प्रांत कार्यालयासमोर ८ मे ते १२ मे २०२३ दरम्यान ५ दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला. तद्नंतर चोपडा म.वाल्मिकी मित्र मंडळाच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयासमोर ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान ६ दिवसांचा अन्नत्याग व धरणे आंदोलन केले. तसेच समन्वय समितीच्या माध्यमातून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या सहकाऱ्यांसोबत १० ऑक्टोबर ते ४ डिसेंबर २०२३ दरम्यान २६ दिवसांचे तीव्र उपोषण केले. त्याचठिकाणी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या सहकार्याने २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान १९ दिवसांचे राज्यव्यापी महाआंदोलन केले. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी १ दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला. त्याचठिकाणी २९ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ दरम्यान २ दिवसांचे उपोषण केले. पुन्हा त्यांनी अमळनेर व चोपडा कोळी समाज पंच मंडळाच्या सहकार्याने अमळनेर प्रांत कार्यालयावर १५ जुलै २०२४ रोजी बिऱ्हाड मोर्चा काढून त्याचठिकाणी २६ जुलै पर्यंत १२ दिवसांचे ठिय्या आंदोलन केले. अशाप्रकारे त्यांनी टप्प्याटप्प्याने एकुण ७१ दिवसांचे आंदोलन उपोषण केल्यामुळे राज्यभरात समाजजागृती होऊन त्यांची ध्येयवेडा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झालेली असुन कोळी लोकांना टोकरेकोळीचे दाखले मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ह्याकाळात त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपली नोकरी शेती व्यवसाय बाजूला सारून नि:स्वार्थ भावनेने समाजसेवा केलेली आहे. त्यांना सर्वस्तरातील कोळीबांधवांचा पाठिंबा होता. त्यांनी हे आंदोलन उपोषण करतांना शांतता कायदा व सुव्यवस्था राखूनच केल्याने संबंधित विभागासह ऑनलाइन व प्रिंट मीडियाचेही सहकार्य लाभले. परंतु जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी सहकार्य न केल्यामुळे कोळी लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यापुढेही जातप्रमाणपत्र व वैधताप्रमापत्रासाठीची लढाई सुरू राहील, पर्यायाने तीव्र रेल्वेरोको आंदोलन करणार असल्याचेही आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांनी ह्या पत्रकांन्वये सांगितले आहे.
No comments