राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे "सत्यमेव जयते" आंदोलन अटींवर स्थगित पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आंदोलनातील सर्व मागण्याचे वेळ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे "सत्यमेव जयते" आंदोलन अटींवर स्थगित
पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आंदोलनातील सर्व मागण्याचे वेळेत निरसन केले जाईल. - तहसीलदार
मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा "सत्यमेव जयते" आंदोलन छेडणार - बाळासाहेब पाटील
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या माध्यमातून दि 25 सप्टेंबर 2024 पासून चोपडा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे "सत्यमेव जयते" आंदोलनास सुरुवात करण्यात आलेली होती. संबंधित आंदोलनामध्ये चोपडा तालुक्यातील व शहरातील सर्वच प्रशासकीय विभाग अंतर्गत तहसील विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, नगरपालिका प्रशासनापासून नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या सर्व बाबींना अनुसरून नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल व वेळेत शासकीय सेवा न मिळत असल्याकारणाने सदर आंदोलन पुकारण्याची वेळ सत्ताधारी घटक पक्ष राष्ट्रवादी (अजितदादा गट) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आली होती तरी सदर आंदोलन च्या सहाव्या दिवशी म्हणजेच दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार महोदयांनी आपल्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येऊन सर्व मागण्यांना न्याय दिला जाईल. नागरिकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात येतील अशी ग्वाही दिली
व सदर आंदोलनाला तूर्तास पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब उर्फ श्री. विजय पाटील यांच्याकडून स्थगिती घोषित करण्यात आली. जर संबंधित मागण्यांच्या अनुषंगाने नागरिकांना पुन्हा समस्या भेडसावल्या व नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निरसन झाले नाही आणि तशा स्वरूपाच्या तक्रारी पुन्हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे यायला लागल्या, त्या समस्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले तर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन "सत्यमेव जयते" या शीर्षकाखाली छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी संबंधित सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकाऱ्यांना दिला.
आंदोलन स्थगित करते वेळी पक्षाचे पदाधिकारी व आंदोलन कर्त्यांपैकी जिल्हा संघटक परेशदादा देशमुख, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, युवक शहराध्यक्ष शुभम सोनवणे, महिला शहराध्यक्ष स्वातीताई बडगुजर, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, शहराध्यक्ष मिलिंद सोनवणे, शहर उपाध्यक्ष गोपाल दाभाडे, सरचिटणीस सुरेश साळुंखे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, मुकेश पाटील, राजेंद्र धनगर ,गोपाल बाविस्कर, भरत पाटील, दत्तू कोळी, नंदलाल धनगर, लहुश धनगर, माजी जि.प.सदस्य सुनील पाटील,मिलिंद बडगुजर, भाजपचे धनंजय पाटील, प्रदीप पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे सुनील बडगुजर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे तसेच तालुक्यातील व शहरातील सर्वपक्षीय शरदचंद्र पवार गटाचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे, काँग्रेसचे, भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील पाच दिवस सतत सत्यमेव जयते आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तालुक्यातील व शहरातील सर्व मान्यवरांचे तसेच जनता जनार्दनांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक अध्यक्ष शुभम सोनवणे यांनी मनःपूर्वक आभार मानले व या आंदोलनाच्या मागे मोठा जनसहभाग उभा केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. जिल्हा संघटक परेश देशमुख यांनी आंदोलनाला प्रसिद्धी दिल्याबद्दल चोपडा तालुक्यातील व शहरातील पत्रकार वर्गाचे आभार व्यक्त केले व सदर आंदोलनाची फलश्रुती म्हणून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सत्यमेव जयते आंदोलनातून जनसामान्यांना मिळालेला दिलासा व न्याय त्यांच्या चरणी समर्पित केला. शहराध्यक्ष गिरीश देशमुख व महिला शहराध्यक्ष स्वातीताई बडगुजर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
No comments