Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमधील ऊर्जा शक्तीचा सकारात्मक उपयोग - प्रा डॉ सचिन नांद्रे

  राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमधील ऊर्जा शक्तीचा सकारात्मक उपयोग - प्रा डॉ सचिन नांद्रे इदू पिंजारी फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकवाड)   ...

 राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमधील ऊर्जा शक्तीचा सकारात्मक उपयोग - प्रा डॉ सचिन नांद्रे


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 राष्ट्रीय सेवा योजना  नॉट मी बट यु  या तत्त्वावर युवाशक्तीचा समाज उत्थानासाठी व देशाच्या विकासासाठी सकारात्मक उपयोग करण्यासाठी स्थापना झाली असून गेल्या असंख्य वर्षात सहा लाख स्वयंसेवकांच्या ज्वाजल्य समाज सेवावृत्तीतून देशाच्या विकासात भरीव कामगिरी केली असून येणाऱ्या काळात भारताला महासत्ता बनवण्यात राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत मोलाची भूमिका पार पाडेल असा आशावाद प्रा डॉ सचिन नांद्रे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी व्यक्त केला. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या औचित्याने तसेच  मेरा भारत पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळेच्या औचीत्याने प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा डॉ कल्पना पाटील ह्या होत्या तर व्यासपीठावर दर्शन नेवे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सतीश पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा डॉ विकास वाघुळदे, महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ पल्लवी भंगाळे यांच्या सहित प्रा डॉ आय पी ठाकूर, प्रा डॉ जी एस मारतळे, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, प्रा विवेक महाजन यांच्यासहित राष्ट्रीय सेवा योजने चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दर्शन नेवे यांनी  सायबर क्राईम  या विषयावर मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत फसवणुकीचे प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून त्यात सोशल मीडियाचा वापर करून अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने सायबर क्राईम पासून स्वतःला सुरक्षित ठेवून सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करावा. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप इत्यादी ठिकाणी स्वतःची खाजगी माहिती अपलोड करताना अत्यंत काळजी घ्यावी. आपण मोर्फिंग, ब्लॅकमेलिंग व आर्थिक फसवणूकीला बळी पडणार नाही याची संपूर्णपणे दक्षता घ्यावी व यासोबतच आयुष्मान भारत, भारतीय टपाल विभाग, भारत सरकारच्या विविध योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत असावे असे आवाहन दर्शन नेवे यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या औचीत्याने पौर्णिमा कोळी , व रिया

 यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ सतीश पाटील यांनी केले. त्यात राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेचा इतिहास, उद्देश व महत्त्व यावर सविस्तर मांडणी केली. प्रमुख अतिथींचा परिचय कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया शिरसाळे व आभार रोहिणी माळी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

No comments