आडगाव येथे वर्षावास पुष्पमाला सहा संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आडगाव ता.चोपडा येथील नालंदा बुद्ध विहारात दि.ब...
आडगाव येथे वर्षावास पुष्पमाला सहा संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आडगाव ता.चोपडा येथील नालंदा बुद्ध विहारात दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षवास कार्यक्रम जिल्हाच्या व राज्याच्या नियोजनानुसार सुरू असून आज वर्षवास पुष्प माला क्रमांक सहा संपन्न झाला, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुरसिंग हरि बाविस्कर हे होते. सदर वर्षवास मालिकेचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे सुदाम बाबुराव ईशी यांच्या हस्ते करण्यात आले.
आजच्या विषय महामंगल सूत्त, श्रावण पौर्णिमाचे महत्व या विषयावर प्रवचनकार रमेश गोबा सोनवणे यांनी धम्म देसना दिली.यावेळी भरत भिमराव शिरसाठ व शालिकग्राम करंदीकर यांनी सुद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुकदेव लक्षमण बाविस्कर यांनी केले.
सदर कार्यक्रमास शालिकग्राम करंदीकर,जानकीराम सपकाळे,भरत शिरसाठ,रमेश सोनवणे,प्रशांत अहिरे (ग्रामपंचायत सदस्य आडगाव),युवराज बाविस्कर ,ओंकार जाधव,धनराज बाविस्कर,अशोक सोये, शशिकांत अहिरे,भारत बाविस्कर बौध्द उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्नेहा जाधव व ओंकार जाधव यांच्या परिवाराकडून खीर दान करून वाटप केली.

No comments