Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवकाळी व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या. संदीप पाटील, शेतकरी संघटनेची मागणी

अवकाळी व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या. संदीप पाटील, शेतकरी संघटनेची मागणी चोपडा प्रति...

अवकाळी व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या. संदीप पाटील, शेतकरी संघटनेची मागणी



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड )

जिल्ह्यात आधीच कोरडा दुष्काळ अनुभवत शेतकऱ्यांनी जमिनीतले पीक तक धरावे म्हणून मेहनत घेतली होती त्यातच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते त्यांतच रब्बी हंगामासाठी कालच्या अवकाळी व गारपीटीमुळे होत्याचे न होते झालेलं आहे मागच्या खरीप हंगामात पंचनामे करून पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही खरीप हंगामाचे व रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे नकरता सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची मदत सरकार ने करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी केली आहे.तापी नदीच्या महापुराचा फटका रावेर,यावल,भुसावळ,चोपडा व अमळनेर तालुक्यांना जबरदस्त फटका बसला हजारो हेक्टर शेतजमीन वरील कापूस, केळी या पिकांची नासधूस या महापुरामुळे झाली होती अतिवृष्टी मुळे सुपीक जमिनीवरील कापसावर लाल्या रोगाने हल्ला चढवल्यामुळे जिल्ह्याभरातील दोन लाख हेक्टर कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत.
ऑगस्ट महिना कोरडा निघाला त्यानंतर सप्टेंबरच्या शेवट जोरदार पाऊस आल्यामुळे कापसावर लाल्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे लाल्या मुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एका हेक्टर वीस क्विंटल उत्पन्न निघणार होते मात्र लाल्या रोगामुळे तेच उत्पन्न तीन क्विंटल वर येऊन ठेपलं आहे. यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी राहून कर्ज न फुटल्याने आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहे सरकार मात्र नेहमीप्रमाणे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चार हजार ते दहा हजाराच्या आत नुकसान भरपाई देते याच्याने उत्पन्नात होणारी घट भरून निघत नाही . 
रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका, दादर , ज्वारी, बाजरी व इतर पिके वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहेत व गारपीटीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. उत्पन्नाची घट भरून निघावी यासाठी शासनाने हेक्टरी सरसकट एक लाख रुपये मदत द्यावी व कर्जबाजारी शेतकऱ्याला निराशेच्या छायेतुन बाहेर काढावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे संदीप पाटील किरण गुजर विनोद धनगर सचिन शिंपी कविता पाटील जयश्री देशमुख अखिलेश पाटील खुशाल सोनवणे नामदेव महाजन सय्यद देशमुख रवींद्र माळी प्रेमचंद धनगर आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे

No comments