मा.आ. बच्चूभाऊ कडू यांचा आदेश येईपर्यत आम्ही ठाम राहू.... उपजिल्हा प्रमुख अजय टप प्रहार सत्तेसाठी राजकारण करित न...
मा.आ. बच्चूभाऊ कडू यांचा आदेश येईपर्यत आम्ही ठाम राहू....
उपजिल्हा प्रमुख अजय टप
प्रहार सत्तेसाठी राजकारण करित नाही तर जनतेच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी काम करतो
अमोल बावस्कार (मलकापूर प्रतिनिधी:-)
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मलकापूर :-
आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्कारु शकत नाही! सत्ता काय ? आज येणार उद्या जाणार पण, सत्तेपेक्षा जनहीत आणि जनता जनार्दंन यांना सोबती घेवून शेतकरी, निराधार, दिव्यांग,विकलांग वंचित,मागास, शिक्षणाच्या क्षेत्रात होणा-या प्रताडीत होतकरु च्या प्रश्नाला प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहारचा कार्यकर्ता यांना ज्यास्त महत्त्व देतो,प्रहार सत्तेसाठी राजकारण करित नाही तर जनतेच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी काम करतो सत्तेत असतांनाही मा.आ.प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग कल्याणासाठी मंत्रालयात विभाग समिती उभारणीवर विशेष लक्ष्य देत दिव्यांगाच्या समस्या सोडवल्या सोबत रात्र दिवस मेहनत करुन परिक्षा देणा-या विद्यार्थिचे वेळेवर पेपर फुटी,वाढती परिक्षा फी,पेपर घोटाळा यावर ही स्पष्ट विधाने मा.आ.बच्चूभाऊ कडू यांनी केली.सत्तेसाठी विकला व झुकला जाणार आमचा पक्ष नाही.येत्या लोकसभेत प्रहारचा कार्यंकर्तां आपली ताकत दाखवेल कुणाला आणायचं कुणाला पाडायच हे आम्ही जाणतो घटाखालील तालुक्याच बोलायच झालं तर आमचे काम बोलते त्यामूळे पक्षादेश आला की आम्ही आमची भुमिका व कार्यं करु असे घटाखालील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टपतालुका प्रमुख अजित फुंदे, तालुका युवा प्रमुख अमोल बावस्कार, तालुका उपप्रमुख अमोल पाटील,शहर प्रमुख शालिग्राम पाटील, शहर उप प्रमुख बळीराम बावस्कार यांच्या वतीने स्पष्ट विधान केले आहे.

No comments