Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अन्यथा अधिकार्‍यांना चपलांचा हार घालू व तोंडाला काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप

मलकापूर शहरातील चाळीसबिघा परिसरातील नाली व रस्त्याचे काम ७ दिवसांत  सुरू करण्यात यावे  अन्यथा अधिकार्‍यांना चपलांचा हार घालू व तोंडाला काळे...

मलकापूर शहरातील चाळीसबिघा परिसरातील नाली व रस्त्याचे काम ७ दिवसांत सुरू करण्यात यावे 

अन्यथा अधिकार्‍यांना चपलांचा हार घालू व तोंडाला काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप


कंत्राटदाराची योग्य ती चौकशी करण्यात यावी तसेच अशा कंत्राटदारांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांचीही चौकशी व्हावी. 

 अमोल बावस्कार मलकापूर प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

मलकापूर : चाळीसबिघा परिसरातील डॉ.मनोज पाटील ते कोलते हॉस्पीटल पर्यंत नाली व रस्त्याचे काम मंजूर तसेच वर्कऑर्डर होऊनही संबंधित कंत्राटदाराने सदर काम अर्धवट करीत गेल्या काही महिन्यांपासून ते बंद आहे. तेव्हा सदरचे नाली व रस्त्याचे काम येत्या ७ दिवसात सुरू करण्यात यावे अन्यथा अधिकार्‍यांना चपलांचा हार घालू व तोंडाला काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज २३ एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे न.प. मुख्याधिकारी यांना दिला आहे. 


दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,  शहरातील चाळीसबिघा परिसरामध्ये डॉ.मनोज पाटील ते कोलते हॉस्पीटलपर्यंत डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश १७/५/२०२३ रोजी संबंधित कंत्राटदारास न.प. प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने या कामामधील नालीचे काम सुरू केले व तेही अर्धवट करून काम गुंडाळण्यात आले. त्याचबरोबर या कामाच्या कार्यारंभ आदेशावेळी डांबरीकरणाच्या रस्त्याचाही कंत्राट संबंधित कंत्राटदारास देण्यात आलेला होता. परंतु या कार्यारंभ आदेशाप्रमाणे ना नालीचे काम पुर्ण करण्यात आले तर रस्त्याचे काम तर करण्यातच आले नाही. 

एकीकडे शासन नागरी मुलभूत सुविधांकरीता लाखो रूपयांचा निधी देते. परंतु हा निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत नसल्याने एकप्रकारे शासनाच्या लाखो, करोडो रूपयांना एकप्रकारे चुना लावण्याचे कामच केले जात आहे. तेव्हा अशा कंत्राटदाराची योग्य ती चौकशी करण्यात यावी तसेच अशा कंत्राटदारांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांचीही चौकशी व्हावी. तर येत्या ७ दिवसात सदरचे कामाला सुरूवात करण्यात न आल्यास नाईलाजास्तव आम्हाला संबंधित अधिकार्‍यांना चपलांचा हाल घालण्या बरोबरच त्यांच्या तोंडाला काळे फासावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे,शहर उपप्रमुख बळीराम बावस्कार, शिक्षक आघाडीचे संजय पाटील सर व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments