Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यातील कापूस पिक विम्याची रक्कम वितरीत होणार

  जिल्ह्यातील कापूस पिक विम्याची रक्कम वितरीत होणार संदीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश शेतकऱ्यांच...

 जिल्ह्यातील कापूस पिक विम्याची रक्कम वितरीत होणार

संदीप पाटील
विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना


शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या ३० एप्रिल पर्यंत जमा होण्यास सुरुवात होणार 

चोपडा प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस,उडीद,मूग,सोयाबीन,ज्वारी, मका इ. पिकांचा विमा जिल्ह्यातील ४,५५,७६२ शेतकऱ्यांनी काढला होता. त्या अनुषंगाने खरीप हंगामात संप्टेबंर व ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे कापसासह इतर पिकांचं लाखो रुपयेच नुकसान झाले होते त्या वेळी  शेतकऱ्यांनी क्राॅप इन्शुरन्स ॲप द्वारा पीक नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने पीक विमा कंपनी च्या प्रतिनिधींनी शेतावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे केले आहेत त्यांतच पीक कापणी करून ठेवलेल्या पिकांची स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाच्या अनुषंगाने नुकसान झाले होते. दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. शेतकरी संघटनेने २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढला होता तसेच वेळोवेळी पाठपुरावा केला यानुसार जळगाव जिल्ह्यातील साधारणता १,५९,००० शेतकऱ्यांनी तक्रारी देऊन त्यांच्या पिकांचे पंचनामे झाले होते अशा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अंदाजित रू.६०-६५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या ३० एप्रिल पर्यंत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. उर्वरित केळी पिक विमाधारक १८००० शेतकऱ्यांना जून महिन्यात विम्याची रक्कम मिळणार अशी माहिती शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी माहिती दिली पिक विमा बाबतचा पाठपुरावा किरण गुजर, विनोद धनगर, सय्यद देशमुख, खुशाल सोनवणे सचिन शिंपी यांनी केला असल्याने ही रक्कम शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. यापुढे देखील शेतकरी संघटना पाठपुरावा करून शेती माती व शेतकरी यांच्या दृष्टीने चांगलं काम करण्यासाठी सोबत राहील असं आश्वासन दिलं आहे.



जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आंदोलनाच्या जोरावर पिक विम्याची रक्कम मिळत आहे यात खूप आत्मिक समाधान मिळाले. शेवटच्या शेतकऱ्याला पिक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत पिक विमा आंदोलन शेतकरी संघटना सुरू ठेवणार


संदीप पाटील

 विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

No comments