NEET व UGC NET झालेला घोळ करणाऱ्या दोषींवर कारवाई करा. सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर नियंत्रण आणणे केंद्र सरकारला शक्य नाही. त्यामुळे विद...
NEET व UGC NET झालेला घोळ करणाऱ्या दोषींवर कारवाई करा.
सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर नियंत्रण आणणे केंद्र सरकारला शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
NEET परीक्षेच्या निकालात उघड झालेल्या गैरप्रकार व UGC NET पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई करा असे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगांव भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा युवक काँग्रेस व एन.एस.यू.आय. च्या वतीने चोपडा तहसील कार्यालय येथे मा.नायब तहसीलदार सचिन बांबळे यांना निवेदन देण्यात आले.
NEET परीक्षेचा निकाल ०४ जून २०२४ रोजी घोषित करण्यात आला, भारतातील २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत भाग घेतला होता. एकाच परीक्षा केंद्रातील ६ विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल, किती जणांना असे गुण मिळाले आहेत जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, त्याच प्रमाणे UGC NET परीक्षेत सुद्धा पेपरफुटी ही झाली असून ती परीक्षा सरकारने रद्द केली आहे याचा अर्थ असा सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर नियंत्रण आणणे केंद्र सरकारला शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. NEET व UGC NET परीक्षेच्या झालेल्या घोळ संदर्भात देशातील विद्यार्थ्यांच्या मनात संताप आहे, मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे एवढ्या गंभीर विषयावर केंद्र सरकार मौन बाळगून असून, एनएसयूआय व युवक काँग्रेस तर्फे तीव्र विरोध केला
संबधित गैर कारभारामुळे देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन CBI चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती. जेणेकरून भविष्यात पुनरावृत्ती टाळता येऊ शकते. यावेळी प्रदेश सचिव एन.एस.यू.आय. चेतन बाविस्कर कार्याध्यक्ष कुणाल पारधी,रोहित शिंदे,गणेश कोळी,गणेश बेलदार,द्रवेश सोलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments