Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्रात प्रथमच मुलाने बनविले आई-वडिलांचे मंदिर, त्यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भागवत सप्ताह

  महाराष्ट्रात प्रथमच मुलाने बनविले आई-वडिलांचे मंदिर, त्यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भागवत सप्ताह  आधुनिक काळातील श्रावणबाळाने आपल्...

 महाराष्ट्रात प्रथमच मुलाने बनविले आई-वडिलांचे मंदिर, त्यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भागवत सप्ताह 


आधुनिक काळातील श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांचे बांधले स्मृती मंदिर  

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा 

(संपादक. :- हेमकांत गायकवाड)

 मातृ देवो भव पितृ देवो भव असं म्हटले जाते त्याच्या प्रत्यय येतो तो म्हणजे चोपडा तालुक्यातील कुंसुबा येथिल राजेश्वर उर्फ बाळू रतन पटेल यांच्या मार्फत या आधुनिक काळातील श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांचे स्मृती मंदिर बांधले हे स्मृति मंदिराची चर्चा अनेर परिसरातुन अनेक लोक येत असतात.


हे मंदिर पाच वर्षांपूर्वी बांधले आणि आई वडिलांच्या स्मृती पित्यर्थ दर वर्षी भजन संध्या, भागवत सप्ताह असा भव्यदिव्य कार्यक्रम राजेश्वर (बाळु) पटेल घेत असतो 


आधुनिक काळात अनेक मुलांना - सुनांना आई- वडील हे घरात ओझे व्हायला लागते आणि पर्यायाने आई - वडिलांना अनेक मुलं वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात परंतु त्याला काही अपवाद असतात असाच एक राजेश्वर (बाळु) पटेल हा रतन पंडित पटेल यांचा दत्तक मुलगा होय. आई वडील जिवंत होते तो पर्यंत तर वाखण्याजोगी सेवा केली परंतु आई वडील हे गेल्या नंतर देखील ते आमच्या स्मृती राहायला हवे यासाठी त्यांनी शेतात चक्क आई वडिलांचे मंदिर उभारले आणि नेहमी त्यांच्या पायाजवळ आम्हाला जागा मिळावी यासाठी त्यांनी चरण पादुका सुध्दा बनवली आहे. मंदिर ही भव्यदिव्य असून हे मंदिर पाहण्यासाठी दूर- दूरहुन येत असतात 




    आई वडिलांच्या स्मृति पित्यर्थ दर वर्षी भागवत सप्ताह ठेवलं जाते तसेच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण गावासह परिसरातील भक्तगणासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आणि यावर्षी तर ७१ वर्षांनी श्रावण महिनातल प्रथमच हा श्रावण सोमवार येत आहे आणि भागवत सप्ताह सुद्धा ५ ऑगस्टला समाप्ती होत आहे. योगायोग चालून आलेला आहे त्यामुळे मी फार आनंदित आहे असे राजेश्वर (बाळू) पटेल यांनी बोलताना सांगितले आहे


No comments