Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुद्देशीय संस्थे तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

  स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुद्देशीय संस्थे तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा...

 स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुद्देशीय संस्थे तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.   

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार

डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे ;गोपाळराव आटोटे गुरुजी  ''   


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वाशिम 

(संपादक :-  हेमकांत गायकवाड)

वाशिम येथील बाबासाहेब गोपले भवन , लहुजी नगर , शासकीय रुग्णालयाच्या मागे , वाशीम येथे दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी  डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .  यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोपाळराव आटोटे गुरुजी यांची उपस्थिती होती . तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय मातंग महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे साहेब , तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये सुभाष वाठोरे , राजू धोंगडे , सरकार इंगोले यांची उपस्थिती होती . यावेळी स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर सर यांनी उपस्थित  सन्मानित पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले . यावेळी गोपाळरावजी आटोटे साहेब  यांनी साहित्यरत्न अनुभव साठे यांच्या प्रतिमेला पुरस्कार केले . गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी '' साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे शोषितांचे कैवारी होते. आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे . ''  असे विचार मांडले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय वैरागडे साहेब यांनी '' साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही भारताला मिळालेली साहित्याची खाण आहे .   साहित्यरत्न शिवशाहीर, अण्णाभाऊ भाऊ साठे हे भारतातील कोहिनूर हिरा आहेत. 


अश्या महापुरुषाचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे '' .असे विचार संजय वैरागडे साहेब यांनी मांडले . तर स्व. लहानुजी  नारायण मानवतकर चे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर सर यांनी '' आपण महापुरुषांच्या जयंतीच्या किंवा पुण्यतिथीच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करायला हवे.जेणेकरून वाशिम येथील ,शासकीय फक्त पिढीचा  रक्त साठा वाढेल आणि अशा या कार्यक्रमामुळे युवक युवतींमध्ये रक्तदानाविषयी जागृती होईल '' असे विचार मांडले . 

यावेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुभाष वाठोरे , राजू धोंगडे , सरकार इंगोले यांची सुद्धा उपस्थिती होती . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल मुंडे , संविधान ढोले , बादल वानखेडे, रामदास कालापाड, अक्षय इंगोले, गजेंद्र राऊत, नितीन बांगरे यांनी परिश्रम घेतले.

No comments