कापूस सोयाबीन भाववाढ यासह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीची ४ सप्टेंबर पासुन शिव जनस्वराज्य यात्रा. प्रशांत डिक्कर. अमोल बावस्कार :- बुलढाणा (...
कापूस सोयाबीन भाववाढ यासह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीची ४ सप्टेंबर पासुन शिव जनस्वराज्य यात्रा.प्रशांत डिक्कर.
अमोल बावस्कार :- बुलढाणा
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
शेगांव/ शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी यांसह विविध प्रश्नांवर दि.४ सप्टेंबर २०२४ पासुन श्री क्षेत्र नागझरी येथुन १९१ गावात शिव जनस्वराज्य यात्रा काढण्यात येणार असल्याचा निर्णय वरवट बकाल येथे स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. दि.३० सप्टेंबर रोजी उपबाजार समिती वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.डॉ.प्रकाश पोफळे, प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, कापसाला १५ हजार तर सोयाबीनला प्रती क्विंटल ९ हजार रुपये हमी भाव,केंद्र सरकारने कापसाच्या गाठी व सोयाबीन पेंड (डीओसी ) आयात करु नये,मागील वर्षीचा खरिप मंजुर पिक-विमा रक्कम व चालु वर्षीचा सरसकट रब्बी पिक-विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विनाविलंब वितरीत करा,शेतमजुरासांठी स्वतंत्र शेतमजुर कल्याण महामंडळ स्थापन करा, व शेतमजुरांचा गोपिनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत समावेश करणे,ईतर देशांप्रमाणे शेतकऱ्यांना BG4/BG7 कपाशी बियाणे व सोयाबीन लागवडीसाठी GM/BT बियाणे मार्केटमधे उपलब्ध करा,शेगाव-संग्रामपूर-जळगाव तालुकास्तरावर शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या उभ्या करून त्यामधे बेरोजगार युवक युवतींना नोकऱ्या द्या,वि वि कपंनीने लघु व्यावसायिक करणाऱ्या ग्राहकांचा दुप्पटीचा विज आकार रद्द करुन DL प्रमाणे विज आकारणी लागु करण्यात यावी,स्थानिक पुरावे ग्राह्य धरुन आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देण्यात यावे,शासन निर्णयानुसार महिला बचत गटांचे व्याज परत करुण थकित कर्ज माफ करा,नामशेष झालेले पानमळे पुन्हारुपी पुनर्जिवीत करण्यासाठी शेतकऱ्यांना भरिव अनुदान द्या,ढासळलेला शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात,शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील प्रलंबित घरकुल लाभार्थ्यांना एकरकमी ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे या मागण्यासाठी श्री क्षेत्र नागझरी ते संग्रामपूर तहसिल कार्यालयावर शिव जनस्वराज्य यात्रा काढण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी संग्रामपूर तहसिल कार्यालयावर मा.खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लाखभर शेतकऱ्यांच्या उपस्थित महामेळावा घेणार असल्याचेही प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना सांगितले. २० सप्टेंबर पर्यंत मागण्या संदर्भात सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभरातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल असा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी या बैठकीत बोलतांना सरकारला दिला आहे. सरकारचा खरपूस समाचार घेत आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्रित येण्याची हिच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोफळे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष किसन कदम, रावसाहेब अडकिने,माधव गाढे, विठ्ठल धाकतोंडे, संतोष परिहार, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील टिकार, स्वाभिमानीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील चोपडे, उज्वल खराटे, गोकुळ गावंडे, गोपाल तायडे,प्रविण गिते, महम्मद शहा, सचिन दिंडोकार,प्रतिक गांवडे, गजानन आमझरे,संतोष गाळकर, तेजराव बोरसे , विलास बोडखे, यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments