रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला नेशन महाराष्ट्र न्य...
रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा होणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
ऑगस्ट महिन्याच्या येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यासंदर्भातील मोठा निर्णय हा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. झालेल्या निर्णयानुसार येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा होणार असा शब्द दिला होता. यानुसार आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अजित दादांनी खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेच्या पहिल्या हफ्त्याची रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतल्याने महिलांना भेट मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज आले असून, पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या दोन ते अडीच कोटी महिलांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. १७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
No comments