Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुका परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊसाने शेतकर्याचे कोट्यवधींच्या पिकांचे नुकसान

  रावेर तालुका परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊसाने शेतकर्याचे कोट्यवधींच्या पिकांचे नुकसान             रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी   रावेर (संपाद...

 रावेर तालुका परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊसाने शेतकर्याचे कोट्यवधींच्या पिकांचे नुकसान     


   

  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी   रावेर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह  पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीं रुपयांचे पिकांचे नुकसान  झाले आहे, वादळ व वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुन्हा एकदा तालुक्यातील 30 गावातील केळी पिकासह

250 हेक्टर चे वर क्षेत्रामधील कापूस, मका,चवळी, उडीद, मूग या पीकांचे 500च्या जवळपास शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे केळी व खरीप पिकांचेही नुकसान झाले आहे.

महसूल प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने प्राथमिक अंदाज वरिष्ठांना पाठविला आहे, सतत दोन दिवसांपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने रावेर तालुक्यातील खिरोदे प्र., रावेर, रसलपूर, मुंजलवाडी, विवरे, बलवाडी, शिंगाडी, भामलवाडी, सिंगत, वडगाव या परिसरातील शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह पावसामुळे फटका बसला आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा, ऐनपूर, निंबोल, मस्कावद गावातील पीक उद्ध्वस्त झाली आहेत. आभोडा खुर्द, जिन्सी, गुलाब वाडी, लालमाटी सह 30 ते 40 वादळग्रस्त गावांचा समावेश आहे. निसर्गाच्या लहरीपणा मुळे रावेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून सततच्या पावसाच्या नुकसानीमुळे शेतकरी राजाचे कंबरडे मोडले आहे आहे.तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्वरित नुकसान भरपाई शेतकर्याना द्यावी अशी मागणी केली जात आहे

No comments