Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रशांत डिक्कर यांच्या शिव जनस्वराज्य यात्रेच्या लढ्याला यश.

  प्रशांत डिक्कर यांच्या शिव जनस्वराज्य यात्रेच्या लढ्याला यश. हरभरा पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात..! अमोल बावस्...

 प्रशांत डिक्कर यांच्या शिव जनस्वराज्य यात्रेच्या लढ्याला यश.

हरभरा पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात..!


अमोल बावस्कार विशेष प्रतिनिधी बुलढाणा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

संग्रामपूर/जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोखलेला पिक विमा मिळण्यासाठी पिक विमा कंपनी व सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत अखेर पिक विमा धारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांच्या पिक विमा तक्रारी रद्द करुन अक्षरशः विमा कंपनीने शेतकऱ्यांवर अन्याय केला.


हे लक्षात घेता स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी १० जुन रोजी थेट पुणे आयुक्त कार्यालय गाठले व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रीतसर पत्र देऊन शेतकऱ्यांच्या रद्द केलेल्या विमा तक्रारी ग्राह्य धरुन विमा रक्कम वितरीत करा अशी मागणी करण्यात आली होती. मा.आयुक्त यांनी रब्बी हरभरा नुकसान बाबत जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा यांचेकडून अहवाल प्राप्त करण्यात आला होता. परंतु विमा कंपन्या,सरकार जाणिवपूर्वक दिरंगाई करित असल्याने सरकार विरोधात जिल्ह्यात १९१ गावातुन शिव जनस्वराज्य यात्रा काढली आणि दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी संग्रामपूर येथे पार पडलेल्या महामेळाव्यातुन पिक विमा प्रश्नावर विविध मागण्या बाबत सरकारला ईशारा दिल्याने विमा कपंनीने आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

हे यश शिव जनस्वराज्य मेळाव्यात एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांचे आहे. जो पर्यंत विमा काढलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले.

No comments