सावदा नगरपालिका घनकचरा प्रकल्प ठप्प? स्वच्छता अभियान फक्त कागदांवर स्वच्छ मात्र जागोजागी घाणीचेच साम्राज्य! "प्रशासकीय काळात सावदा न...
सावदा नगरपालिका घनकचरा प्रकल्प ठप्प? स्वच्छता अभियान फक्त कागदांवर स्वच्छ मात्र जागोजागी घाणीचेच साम्राज्य!
"प्रशासकीय काळात सावदा नगरपालिका संपूर्ण कारभार वाऱ्यावर"
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेत प्रशासकीय कार्य काळापासून शहरात स्वच्छताचे निकष धाब्यावर ठेवून,याकडे सातत्याने पालिकेतील संबंधित विभागाकडून दुर्लक्षीत पद्धतीने स्वच्छता ठेवणे बाबत फक्त औपचारिकता पुरती केली जात असल्याचे दिसून येते.
शहरात दलीत वस्ती परिसर,न.पा.उर्दु मुला/मुलींची शाळा मागील महिला व पुरुषांचे सार्वजनिक शौचालय,साळी वाडा येथील शौचालय आयुब भंगार दुकाना समोरील महिलांचे शौचालय,शनी मंदिरा समोरील गटर या वरील ठिकाणी नियमित व वेळेवर साफसफाई केली जात नसल्यामुळे करदात्यांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण करणारे अस्वच्छतेचे विदारक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.अशा दूषित वातावरणामुळे विषारी दास मच्छरांची उत्पत्ती व डेंगू,मलेरिया सारखे आजारांची लागण येथील करदात्यांना झाल्याची माहिती दवाखान्यात तसेच रक्त लघवी तपासणी केंद्र जवळ अनेक रुग्णांचे कुटुंबातील व्यक्तीं उघडपणे संताप व्यक्त करून बोलताना मिळून येते.
स्वच्छता अभियाना वरती प्रशासनाकडून अमाप पैसा तसेच करत्याकडून करस्वरूपी जमा पालिकेत जमा होत असलेला पैसा स्वच्छतेवर खर्च होऊन सुद्धा शहराती सार्वजनिक स्वच्छालय, गटारी,नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने सतत अस्वच्छता दिसून येणे समझण्याच्या पलीकडची बाब आहे.तरी स्वच्छता अभियान फक्त कागदावर राबविला जात असल्याचे यावरून दिसून येते.तरी ही समस्या कायमची दुर व्हावी म्हणून विजय तायडे उर्फ कालू,पिंटू तायडे,प्रदिप लोखंडे,मनोज लोखंडे,प्रमोद तायडे,सचिन तायडे,युवराज निकम यांनी मुख्याधिकारी भुषण वर्मा नुकतेच निवेदन दिले आहे.
अनू घनकचरा प्रकल्प वरती प्रक्रिया नियमित ठप्प
अनेक दिवसांपासून पालिका घनकचरा प्रकल्प वरती ओला सुखा कचऱ्या बाबतची नियमित प्रक्रिया ठप्प असून,येथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून,याकडे धुळे येथील आस्था नामक संस्थेचे ठेकेदार भीरकून पाहत नाही.व याकडे मुख्याधिकारी पालिका आरोग्य अधिकारी सह प्रशासकीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि लोकसेवक देखील सोयस्कर रित्या दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.तरी देखील ठेकेदारांना घनकचऱ्यातून लाखो रुपयांचा फायदा होत असून,मात्र खत विक्रीतून आणि वाहन भाडोत्री दर महा देऊन फक्त हजारोच पैसे पालिका प्रशासनाला मिळत असतात.तरी हा ठेका प्रशासनास नुकसानदायक ठरत असून याकडे जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केले जात आहे.
No comments