" महिला व मुलींचे विशेषतः लहान बालकांचे अत्याचाराबाबत शिक्षक व शिक्षकांचा सहभाग आवश्यक,पोलीस विभाग आपणास सर्व ती मदत करेल..... अण्णासाह...
" महिला व मुलींचे विशेषतः लहान बालकांचे अत्याचाराबाबत शिक्षक व शिक्षकांचा सहभाग आवश्यक,पोलीस विभाग आपणास सर्व ती मदत करेल.....अण्णासाहेब घोलप(डी वाय एस पी,चोपडा).
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
..... _चोपडा येथे शेतकरी कृती समितीचे वतीने सध्या शाळा व घरात देखील बालकांवर व मुलींवर महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत ते रोखण्यासाठी Good Touch व Bad Touch "बाबत पालक महिलांना प्रशिक्षण देनेसाठी शिक्षक व शिक्षिका यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्याचा छोटेखानी प्रयत्न शेतकरी कृती समिती चोपडा यांचे वतीने आयोजित करण्यात आला त्यावेळी सुरवातीलाच जर अश्या प्रवृत्तींना ओळखण्यात येवून त्याची माहिती शिक्षक व पालकांनी पोलिसांना दिली तर खूप मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते त्यासाठी आपण सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिक्षक अण्णासाहेब घोलप यांनी केले._
_रोटरी चे पुढील प्रांतपाल व बालरोगतज्ज्ञ डॉ राजेश पाटील यांनी आताच्या काळात निसर्गातील व मोबाईल चे जगात ज्या गोष्टी मुलांना दहावी बारावी त कळायच्या त्या आता पाचवी सातवीत कळायला लागल्याने पालक व शिक्षक यांनी सजग राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले व रोटरी यासाठी राज्यभर काम सुरू करीत आहे._
पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी महिलांना सिक्स सेन्स असतो त्या मुळे ती कोणाची नजर किंवा टच कसा ते ओळखू शकते त्यात दरारा निर्माण केला तर कुणाचीही हिम्मत होणार नाही तेच आपल्या मुलींना देखील शिकवा,पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलिसांच्या मदतीसाठी चे नंबर चा वापर करावा म्हणजे दहा मिनिटात तेथे आपणास मदत मिळेल असा शब्द दिला.
ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ कांचन नारखेडे यांनी " टच" ह्या शब्दा ऐवजी "safe touch"ह्या शब्दाचा प्रयोग जास्त महत्वाचा असून आई,वडील,आजी आजोबा यांचे स्पर्शाचा आनंद देखील हिरावता कामा नये हे सांगताना "जे अवयव स्विमिंग सूट मध्ये बंद असतात त्यांना दुसऱ्याने केलेला स्पर्श हा Bad व उर्वरित अवयवांना केलेला स्पर्श हा Good touch होऊ शकतो.या सोबत सध्या मुली मुल दोघांना वेगळे मार्गदर्शन केलं तर मुलांच्या डोक्यात वेगळे किडे वळवळू शकतात की त्यांना काय सांगितलं त्या पेक्षा बोला अन्यथा ते मोबाईल मध्ये सर्च करतात व नको ते डोक्यात घेतात त्यामुळे वाईट घटना घडतात.त्यांनी स्लाईड द्वारे सारे समजून सांगितलं.
_ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व मानसोपचार समुपदेशक भारती ताई कुमावत यांनी त्या या गुन्ह्यातील हाताळलेल्या बाबी सर्विस्तर पने सांगितलं "आई वडील यांनी काळजी न घेतल्याने मुलांनी ते बघितल व त्यात एक मुलगी सहा महिन्याची बाळंत राहिली ही बाब फारच चिंतनीय आहे.अश्या केसेस मध्ये मुलीची गावाची ओळख लपवून ठेवली जाते त्यामुळे न घाबरता पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले._ मानसोपचार तज्ञ डॉ उमा चांदूरकर यांनी आपले प्रेझेंटेशन मध्ये Good Touch व Bad Touch बाबतचे सारे बारकावे
प्रेझेटेशन द्वारे समजावून सांगितल व ज्या बाबी आपण मुलींना किंवा पालकांना समजावून सांगतो त्याची उजळणी केव्हा व कशी करावी हे समजावले.त्या बदलापूर येथीलच असल्याने तेथील शाळेतील घडलेल्या प्रसंगाबाबत त्या फार भावूक होत्या.
डॉ प्राजक्ता भामरे व डॉ नीता जैस्वाल यांनी मुले व मुली वयात येतात होणारे बदल बाबत त्यांच्या सोबत आईने काय चर्चा करावी, यात आज तुझ्या बाबतीत चांगले काय झाले?सगळ्यात वाईट काय घडलं?तू काय केलं?काय वेगळे वाटले असे साधे साधे प्रश्न विचारले तरी कुठे चुकत असेल तर लगेच कळेल.यासोबत चोपडा डॉक्टर्स असोसिएशन प्रत्येक शाळेत यासाठी पालकांसाठी प्रशिक्षण घेणार असल्याचे सांगितलं.
तर पालक म्हणून हजर असलेले तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी देखील त्यांच्या मनातील प्रश्नांना वाट करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी पाटील यांनी शेतकरी कृती समितीचे सदस्य यांनी वाईट प्रवृत्ती ह्या प्रत्येक काळात होत्या,त्या त्या काळात अश्या राक्षसांचा फडशा महिला नी दुर्गा सोबत काली मातेचा अवतार घेवून केला त्यासाठी प्रशिक्षणासाठी खास शिक्षक व शिक्षिका यांच्या पासून सुरुवात केल्याचे नमूद करतानाच,समाजात पाच टक्के चांगले व पाच टक्के वाईट लोक नेहमीच असतात उर्वरित ९०%, त्यातील जो वर्ग सक्रिय त्याच्या मागे असतात.आता देखील तेच होत आहे,तरी सज्जनांनी शांत न बसता सक्रिय होनेचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिपक पाटील यांनी केले व प्रत्येक वेळेस प्रसंगानुरूप उदाहरणे देताना युरोप मधील एका परगण्यातील राजकन्या जेव्हा जंगलात गेली होती व तिच्या बाजूला एक वाघ मेला होता तेव्हा एक शूरवीर भेटला व तो त्याच्या शुरत्वाच्या बढाया मारत तिला ऐकवित होता अशी एकटी जात नको जावू वगैरे वगैरे ,जेव्हा ती परत राजवाड्यात गेली तेव्हा राजाने एव्हढा उशीर का झाला व ह्या सोबत तरुण कोण असे प्रश्न विचारले तेव्हा तिने राजाला सांगितल ,"मी जेव्हा जंगलात पाणी प्यायला ओढ्याजवळ थांबली तेंव्हा मला पाण्यात एक वाघाचे प्रतिबिंब दिसले आपण शिकवलेल्या बाबीमुळे मी त्याला तसाच बाण मारून ठार केले व तेथे हा तरुण मला भेटला व त्याच्या सगुरत्वाच्या गोष्टी सांगत आहे...सबब प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला प्रत्येक संकटात कसे सामोरे जायचे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले व अध्यात्मिक गोष्टी चा देखील कसा आधार घ्यावा असे सहज कथन केले.
साऱ्यांचे आभार शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश पाटील यांनी मानलेत. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती बी डी ओ रमेश वाघ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप
लासुरकर, सहा सरकारी अभियोक्ता ॲड भाग्यश्री अहिरराव पाटील,सौ विजया पाटील,सौ संध्या महाजन,डॉ प्रकाश सपकाळे ,पत्रकार चंद्रकांत पाटील,सुनील पाटील ,मिलिंद सोनवणे, यशवंत जडे यांचेसह हजारो शिक्षक शिक्षिका हजर होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शेतकरी कृती समितीचे डॉ
या कार्यक्रमासाठी डॉ रवींद्र निकम,भागवत महाजन ,मेहमूद बागवान,प्रफुल्ल राजपूत,प्रशांत पाटील,चंद्रकांत पाटील,अजित पाटील,संजीव बाविस्कर,ॲड कुलदीप पाटील,कुलदीप पाटील,धीरज महाजन,पंकज कोळी, प्रा प्रदीप पाटील , पोलीस विभाग,पंचायत समितीचे सहकारी,नगरपरिषद कर्मचारी ,श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन चे प्राचार्य व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
_बंधूंनो व भगिनींनो_ 🙏,
_एकदा एका जंगलाला आग लागली होती.त्यावेळेस जो तो आपले कर्तव्य पार पाडत होता, त्यात एक चिमणी आपल्या चोचीत पाणी घेवून ती आग विझविण्याचा प्रयत्न करीत होती.तेव्हा एका हत्तीने तिला विचारलं अग चिमणी तुझी चोच केवढी आग केव्हढी...त्या वेळेस चिमणी ने उत्तर दिले ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहला जाईल त्या वेळेस माझे नाव आग लावणाऱ्यांच्या नव्हे तर विझवणाऱ्यांच्या यादीत असेल...बस तसाच आमचा शेतकरी कृती समिती चा हा छोटासा प्रयत्न होता_ अपेक्षित शिक्षक बंधू भगिनींनी जो प्रतिसाद दिला त्यात १०७२जणांचं प्रत्यक्ष नोंदणी व काहीची गाडी असल्याने नोंदणी राहिली,काही पालक,नागरिक,विद्यार्थी,पत्रकार यांची अंदाजे संख्या २००ते२५०म्हणजे जवळ जवळ १३००लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.नाट्यगृह ची क्षमता कमी त्यात काही दुसऱ्या खुर्च्या टाकल्या होत्याच पण तरीही शेकडो उभे व काही बाहेर अशी अवस्था झाली.आमच्याकडुन गैरसोय झाली,दिलगिरी व्यक्त करतो,... 🙏धन्यवाद🙏...
आपलेच ..
एस बी नाना व सारे शेतकरी कृती समितीचे सदस्य,चोपडा.जळगाव
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
No comments