"शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होणेसाठी आचारसंहिता शिथिल करून मुख्य सचिवांना पंचनामे करणेस आदेश देणेबाबत निवडणूक आयुक्त यांच्याकडे शे...
"शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होणेसाठी आचारसंहिता शिथिल करून मुख्य सचिवांना पंचनामे करणेस आदेश देणेबाबत निवडणूक आयुक्त यांच्याकडे शेतकरी कृती समिती ची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
"शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होणेसाठी आचारसंहिता शिथिल करून मुख्य सचिवांना पंचनामे करणेस आदेश देणेबाबत निवडणूक आयुक्त यांच्याकडे शेतकरी कृती समिती ची मागणी लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा.....
....नियमित पावसाळा संपला पण महाराष्ट्र भर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सारेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहेत,परंतु आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन त्याचे पंचनामे करणे टाळत आहे.जर त्याचे पंचनामे झालेच नाहीत तर नवीन आलेले सरकार नुकसान भरपाई कशी जाहीर करेल.
पंचनामे करणे म्हणजे नुकसान भरपाई जाहीर करणे नाही.तो निर्णय कोणतेही सरकार आले तर कायद्यानेच करेल.परंतु पंचनामे नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ची नोंदच नसेल,निवडणुका संपल्याने राजकीय लोक दुर्लक्ष करतील.एन डी आर एफ किंवा एस डी आर एफ चे नियमाने नुकसान भरपाई मिळू शकणार नाही.
म्हणून निवडणूक आयोग यांचेकडे शेतकरी कृती समितीचे वतीने पंचनामे करण्यास परवानगी देणेबाबत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना आदेश व्हावेत यासाठी
एस बी पाटील हे प्रयत्न करीत आहेत,त्यावर संबंधित विभाग लवकर निर्णय घेतील असे त्यांना आयोगाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
No comments