Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखेर न्याय न मिळाल्याने वनमजूराचे आत्मदहन, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तो मी नव्हेच्या भुमिकेत

  अखेर न्याय न मिळाल्याने वनमजूराचे आत्मदहन, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तो मी नव्हेच्या भुमिकेत ? पिंपळदर प्रतिनिधी  :- (संपादक-:- हेमकांत ...

 अखेर न्याय न मिळाल्याने वनमजूराचे आत्मदहन, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तो मी नव्हेच्या भुमिकेत ?


पिंपळदर प्रतिनिधी  :-

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 ताहाराबाद वन परीक्षेत्रातील वन मजूर राजेंद्र साळुंके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून  आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, या गंभीर प्रकरणाकडे वन विभाग व पोलीस प्रशासनाने सपशेल डोळे झाक केली असता, आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजेंद्र साळुंके यांनी ताहाराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन  करण्याचा प्रयत्न केला असता यात राजेंद्र साळुंके हे ५० ते ६० टक्के गंभीर रित्या भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र साळुंके यांनी यापूर्वीच  वन विभागाला तसेच पोलीस प्रशासनाला कळविले होते तरी सुद्धा या विभागानी याकडे सपशेल डोळे झाक केल्याचे स्पष्ट दिसत आहे, राजेंद्र साळुंके हे स्वतःला पेटवून घेत असतांना वन विभागातील कर्मचारी यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली जणू काही त्यांना हे हवेच होते किंव्हा राजेंद्र साळुंके यांचा त्यांना बळी हवा होता कि काय अशी शंका येते.


एवढे गंभीर प्रकरण घडले असताना सुद्धा लोकप्रतिनिधी हे देखील तिकडे फ़िरकले नाहीत हे देखील खेदजनक आहे जर पोलिस प्रशासन व वनविभागाकडून या निवेदनाची दखल घेतली असती तर वनमजूर राजेंद्र सोळूंके यांच्या वर आत्मदहन करण्याची वेळ आली नसती.संबधित अधिकारी यांनी उंटावरून शेळ्या हाकलण्याचा प्रकार केल्याचे घटनेचे गांभीर्याने लक्षात येते आहे.ध्वजारोहन नंतर सोळूंके यांनी ज्या ठिकाणी आत्मदहन केलं त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी घटना घडत असताना फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

जर आत्मदहनाचा इशारा दिला गेला होता तर मग पोलिस प्रशासन व वनविभागाकडून योग्य वेळी कोणतीही कार्यवाही का करण्यात आली नाही? दोघां विभागांकडून फक्त बघ्याची भूमिका घेत आपली जबाबदारी टाळली आहे.जबाबदार व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर संबंधित अधिकारी कार्यवाही करतील का? परत ये रे माझ्या मागल्या चा प्रयत्य येतो हे बघणं औचित्याचे ठरणार आहे. 


No comments