Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माणसातील माणूसपण निर्माण करण्यासाठी अस्सल वाड्मय निर्मितीची आवश्यकता -उदघाटक प्रा.डॉ.एन.के.ठाकरे(प्रथम कुलगुरू, उमवि, जळगाव)

  माणसातील माणूसपण निर्माण करण्यासाठी अस्सल वाड्मय निर्मितीची आवश्यकता -उदघाटक प्रा.डॉ.एन.के.ठाकरे(प्रथम कुलगुरू, उमवि, जळगाव) चोपडा प्रतिनि...

 माणसातील माणूसपण निर्माण करण्यासाठी अस्सल वाड्मय निर्मितीची आवश्यकता -उदघाटक प्रा.डॉ.एन.के.ठाकरे(प्रथम कुलगुरू, उमवि, जळगाव)


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा मराठी अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२९ जानेवारी, २०२५ रोजी प्रथम वर्ष कला मराठी या विषयाच्या द्वितीय सत्रावर आधारित 'विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा.डॉ.एन.के.ठाकरे यांच्या हस्ते  खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागत गीत सादर केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी बीजभाषक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.म.सु.पगारे,  प्रमुख अतिथी म्हणून खान्देशातील सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक अशोक निळकंठ सोनवणे तसेच प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, चर्चासत्राचे संयोजक आणि मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ तसेच चर्चासत्र समन्वयक डॉ.एम.एल.भुसारे आदि उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या मराठी अभ्यास मंडळ संपादित 'खान्देश काव्यप्रबोध' तसेच प्रा. डॉ. फुला बागूल लिखीत 'कविता खान्देशची (विशेष संदर्भ: खान्देश काव्यप्रबोध मधील कविता) व  डॉ. अक्षय घोरपडे, डॉ. विजेंद्र पाटील, डॉ. मधुचंद्र भुसारे लिखीत 'खान्देशी काव्यप्रबोधची समीक्षा' व डॉ. अक्षय घोरपडे लिखीत 'आधुनिक समाज माध्यमांचा परिचय या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्चासत्र संयोजक व उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले तसेच पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी करून दिला. या चर्चासत्रात जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामधून एकूण ६० संशोधक प्राध्यापक तसेच खान्देशतील १२ ख्यातनाम कवी सहभागी झाले होते. 

 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे म्हणाले की, ' दर्जेदार अभ्यासक्रमातून विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध होते. खानदेशी भूमीतील मूल्य, संस्कार, संस्कृती साहित्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. माणसातील माणूसपण निर्माण करायचे असेल तर अस्सल वाड्मय निर्माण होणे गरजेचे आहे.काळ्या मातीचा हुंकार काव्यात असायला हवा. काव्यनिर्मितीची दृष्टी विद्यार्थ्यांना लाभेल अशा अभ्यासक्रमाची निर्मिती व्हायला हवी'. यावेळी त्यांनी ए.आय. सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे विद्यार्थी व शिक्षकांपुढे उभे ठाकलेले आव्हान याची जाणीव विद्यार्थ्यांना व शिक्षकांना करून द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.     

      याप्रसंगी प्रो. डॉ. म. सु. पगारे बीजभाषण करतांना म्हणाले की, 'विद्यार्थ्यांना सकस ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी त्या-त्या भूमीतील, प्रदेशातील विचारमूल्य, संस्कार रुजवणे हा अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश हवा. काव्यामध्ये प्रासादिकता असेल तर ती अस्सल कविता रसिकाला भावविश्वात रममाण करते. कवितेतील व साहित्यातील वास्तव विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवे, असे मत त्यांनी यावेळी बीजभाषणातून व्यक्त केले. 

    यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की,  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण कशी होईल याचा विचार करून अभ्यासक्रम तयार केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजायला मदत होईल'.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.बी. पाटील यांनी केले तर आभार सौ.एम.टी.शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत्रातील बहुसंख्य प्राध्यापक बंधू-भगिनी, संशोधक विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments