adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्माचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित व्हावे;फैजपूर प्रांत कार्यालयावर बौध्द समाजाचा मोर्चा

  महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्माचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित व्हावे; फैजपूर प्रांत कार्यालयावर बौध्द समाजाचा मोर्चा  प्रांताधिकारी बबनराव क...

 महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्माचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित व्हावे;फैजपूर प्रांत कार्यालयावर बौध्द समाजाचा मोर्चा 

प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना दिले निवेदन 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर : १९४९ चा बोधगया मंदिर कायदा रद्द करून बोधगया महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्माचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित व्हावे, तसेच बिहार राज्य पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षु संघ आणि बौद्ध बांधवांची बिनशर्त सुटका व्हावी, या मागण्यांसाठी ७रोजी फैजपूर येथे यावल आणि रावेर तालुक्यातील बौद्ध समाज बांधवानी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.या आंदोलनाला भारत सरकार, बिहार सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने लवकरात लवकर पाठिंबा यावा, अशी मागणी बौद्ध समाजाने केली.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. यावल आणि रावेर तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून सुभाष चौक, अंकलेश्वर-बहाणपूर महामार्ग मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून प्रांत

कार्यालया पर्यंत काढण्यात आला. प्रांत कार्यालयावर बौद्ध समाज बाधवानी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी १९४९ चा कायदा रद्द करण्याची मागणी करताना सांगितले की, 'बोधगया महाबोथी महाविहार हे बौद्ध थर्मियांचे पवित्र स्थळ असून, त्यावर बौद्धांचे पूर्ण नियंत्रण असायला हवे. बिहार राज्य पोलिसानी भिक्षु सघ आणि बौद्धांना ताब्यात घेतले आहे. त्यांची तात्काळ बिनशर्त सुटका झाली पाहिजे. भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व बौद्ध समाज बांधवांनी ही मागणी एकमुखाने लावून धरली.

मोर्चा दरम्यान, भिक्षू संघाच्या हस्ते प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन दिले. निवेदनातून बौद्ध समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सरकार आणि संबंधित यंत्रणांना करण्यात आले. प्रसंगी यावल आणि रावेर तालुक्यातील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाच्या माध्यमातून बौद्ध समाजाने सरकारला या संवेदनशील मुद्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

No comments