जळगाव जिल्ह्यात वाळू बंदी पण रावेर तालुक्यात खाजगी आणि सरकारी बांधकामांठिकाणी मुबलक वाळू साठा? रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेम...
जळगाव जिल्ह्यात वाळू बंदी पण रावेर तालुक्यात खाजगी आणि सरकारी बांधकामांठिकाणी मुबलक वाळू साठा?
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सुकी नदी आणि शेजारच्या तापी नदीतून बेकायदेशीर गौण खनिज, माती, गाळ आणि वाळूची तस्करी कोणत्याही अडचणीशिवाय वाहतूक केली जात आहे. अवैध गौण खनिज तस्कर दररोज मध्यरात्री १२ वाजे नंतर तापी नदी पात्रातून हातनूर धरण, उदळी, तासखेडा, मस्कावद, सावदा मार्गाने मोठा वाघोदा सावदा परिसरात ट्रॅक्टर ट्रक डंपरद्वारे परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे शेकडो ब्रास वाळूची वाहतूक करत आहेत.
व शासनाचा महसूल बुडवित आहेत
रावेर तालुक्यात पाल ऐनपुर निंभोरासीम दसनूर सिंगनूर सिंगत बलवाडी चिनावल हतनूर धरण उदळी तासखेडा रायपूर सावदा, मस्कावद आणि परिसरातील वाळू तस्कर सावदा मोठा वाघोदा मार्गाने मध्यरात्रीच्या सुमारास वाळू तस्करी करत आहेत. तस्करी करण्यापूर्वी, ते वाळू तस्कर माफिया प्रथम मोटारसायकल किंवा चारचाकी वाहनावरून ट्रॅक्टर, ट्रक किंवा डंपर गावात येण्या अगोदर स्वतः येतात आणि परिसराची रेकी पाहणी करतात आणि नंतर सिग्नल मिळताच ते बेकायदेशीरपणे वाळू वाहून नेणाऱ्या वाहनाला बोलवून नियुक्त केलेल्या ठिकाणी बोलावतात आणि वाळू उपसतात,मध्य रात्रीपासून सकाळी ६ वाजेपर्यंत वरील सर्व ठिकाणच्या नदीपात्रातील बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन उपसा आणि चोरटी वाहतूक केली जाते. निंभोरासिम ऐनपूर बलवाडी सिंगत सिंगनूर दसनूर निंभोरा वडगाव चिनावल कुंभारखेडा लोहारा चिनावल मार्गावर पाल ते पाल घाट खिरोडा चिनावल मोठा वाघोदा निंभोरा मोठा वाघोदा सावदा रेल्वे स्टेशन मस्कावद सावदा मोठा वाघोदा बु या मार्गांवर दररोज रात्री १२ नंतर विना परवान्याशिवाय अवैध वाळू तस्करी सुरू आहे आणि ही वाळू गोरगरीब तसेच इतरांना तीन चार पट जास्त किमतीत विकून महसूल प्रशासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. अवैध गौण खनिज माफिया वाळू तस्कर गलेलठ्ठ श्रीमंत होत आहेत आणि महसूल विभागाचे लाखो करोडो रुपयांचे नुकसान करत आहेत हे निदर्शनास येत आहे. जर जळगाव जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतूक बंदी असेल, तर खाजगी आणि सरकारी बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वाळू कुठून येते? हा संशोधनाचा विषय आहे का? खनिज वाळूसह वाळूचे बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतूक प्रतिबंधित आहे. तर मग सर्व खाजगी शासकीय बांधकाम प्रकल्पामध्ये वापरली जाणारी वाळू कोणती? तो कुठून येते?कोण आणतो?या वाहतुकीला परवानगी कोणी दिली? नाहीतर, या बेकायदेशीर गौण खनिज माफिया वाळू तस्करांना इतकी मोकळीक कोण देते? ते का दिले कसे? जळगाव जिल्ह्यासाठी सन्मान पुरस्कार मिळालेल्या आणि कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि रावेरवर कारवाई करावी.
रावेर तालुक्यातील सुकी नदी आणि शेजारील तापी नदी पात्रातून अवैध गौण खनिजे, वाळू आणि मातीची तस्करी करणाऱ्या वाळू तस्करी माफियांवर कायदेशीर कारवाई करावी. गरिबांना दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकणे थांबवावे आणि लोकांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत. क्रमशः भाग २
No comments