Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलचे माजी नगराध्यक्षांनी केली पालिकेचे अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी. प्रसिद्धी पत्र काढून पत्रकारांना दिली माहिती.

  यावलचे माजी नगराध्यक्षांनी केली पालिकेचे अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी. प्रसिद्धी पत्र काढून पत्रकारांना दिली माहिती. अ...

 यावलचे माजी नगराध्यक्षांनी केली पालिकेचे अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी.

प्रसिद्धी पत्र काढून पत्रकारांना दिली माहिती.

अतुल पाटील माजी नगराध्यक्ष


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

यावल : येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी एक प्रसिद्धी पत्रकाव्दारे नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील दिले असून सत्यम पाटील यांनी आपल्या पदाचा गैर उपयोग केल्याचा त्यांचा आरोप आहे.

नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एक तक्रार अर्ज दिला आहे व त्या संर्दभात प्रसिध्दपत्र काढून पत्रकारांना माहिती दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्याकडे आस्थापने नुसार पाणीपुरवठा व स्वच्छता निरीक्षक अशी जबाबदारी आहे. परंतु नगरपालिकेमध्ये बांधकाम अभियंता हे पद सुमारे दोन वर्षापासून रिक्त असल्याने बांधकामाच्या अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे. तेव्हा सदर पदभार घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात काढण्यात आलेल्या निविदांमध्ये मनमानी पद्धतीने अटी व शर्ती टाकून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात शहरातील ११ बगीच्या देखभाल दुरुस्तीच्या निविदा १४ महिन्याच्या कालखंडात तब्बल सहा वेळेस काढण्यात आलेल्या आहेत. सदर निविदा कधी ऑफलाइन तर कधी ई -निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा मध्ये मर्जीतील कंत्राटदार व्यक्तीसह अन्य कत्रांटदाच्या निविदा आल्याने त्या पुन्हा पुन्हा रद्द करण्यात आल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गटारीसह बांधकाम करणे, पुलाचे बांधकाम करणे या कामाची निविदा दिनांक २० मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदामध्ये टेंडर मॅनेज होण्याच्या दृष्टीने अटी,शर्ती टाकण्यात आल्या होत्या. परंतु मर्जीतल्या कंत्राटदारा व्यतिरिक्त अन्य कंत्राटदारांनी नगरपरिषद यावल यांना पत्र दिल्याने निविदा मनमानी पद्धतीने रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेचे जेसीबी हे नगरपालिकेच्या हद्दीतील क्षेत्रात खाजगी लोकांना शेती कामे करण्यासाठी वापरण्यात देण्यात येत आहे. डिझेल नगरपालिकेच्या निधीतून वापरून खाजगी लोकांकडून २० ते २५ हजार रुपये ते घेत आहेत असा देखील आरोप आहे. तर नगरपालिकेमध्ये सुमारे दोन महिन्यापासून शासनाने बांधकाम अभियंता म्हणून संग्राम शेळके यांना पदस्थापना दिली आहे. असे असले तरी देखील यावलचे मुख्याधिकारी निशीकांत गवई यांनी मर्जीतल्या पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्याकडील अतिरिक्त पदभार न काढता शासनाने दिलेल्या बांधकाम अभियंता शेळके यांना पदभार दिला नाही असा देखील त्यांचा आरोप आहे. त्यास प्रमाणे पाणीपुरवठा विभागामध्ये अनागोदी कारभार चालू आहे. असे देखील आरोप आहे. शहरांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून गटारी भरल्या आहेत असा आरोप आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता निरिक्षक पदाची जबाबदारी असल्यास सत्यम पाटील आठवड्यातून फक्त एक दिवस येतात व हजेरी पुस्तकावर मात्र मागील दिवसाच्या स्वाक्षऱ्या करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तेव्हा त्यांच्या या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे चौकशी नंतर दुध का दुध पाणी का पाणी होईल.

( वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दैनंदिन हजेरीपट व सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ऑफलाइन ऑनलाईन टेंडरचे कागदपत्र बारकाईने चेक केले तर केले यात मोठा घोळ झाल्याचे निष्पन्न होऊ शकते असे अतुल पाटील यांनी म्हटले आहे )

No comments