शाहू महाराज हे खरे परिवर्तनाचे अग्रेदूत - विजयराव खाजेकर श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नव स्वराज्य सेनेच्या वतीने ...
शाहू महाराज हे खरे परिवर्तनाचे अग्रेदूत - विजयराव खाजेकर
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नव स्वराज्य सेनेच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती आझाद मैदान श्रीरामपूर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी नव स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव खाजेकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना विजयराव खाजेकर म्हणाले की, शाहू महाराज यांच्या दृष्टिकोनात मानवता हा धर्म होता. शैक्षणिक धोरणातून त्यांनी कोल्हापूर संस्थानात सर्व जाती-धर्मातील मुला - मुलींसाठी शाळा सुरू केल्या शिष्यवृत्ती, निवासी विद्यालय, सुलभ प्रवेश, वस्तीगृहे हे सर्व त्यांच्या प्रगत धोरणाचे भाग होते .धर्माच्या आधारावर शिक्षणाला बंदी घालणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी स्पष्ट विरोध केला, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे ही त्यांची ठाम भूमिका होती म्हणून छत्रपती शाहू महाराज हे खरी परिवर्तनाचे अग्रदूत असल्याचे श्री.खाजेकर म्हणाले.
याप्रसंगी रंगनाथ पितळे, दत्तात्रय शिरसाठ, दादू (मास्तर) खंडागळे, कारभारी जाधव, विकास ढोकचौळे, संतोष मिरपगार ,राजेंद्र राठोड, प्रभाकर साळवे , सागर बागुल, बबन जाधव, विल्सन दुशिंग, डॅनी शिंदे , अनिल वाघमारे, अजय गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments