'खालिद का शिवाजी' या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहिन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना ...
'खालिद का शिवाजी' या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहिन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्या चित्रपटावर बंदीआणा,
हिंदू जनजागृती समिती तर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तहसीलदार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार नवी दिल्ली व मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना निवेदनाद्वारे खालील नमूद असे की 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, तसेच रायगडावर महाराजांनी मशिद उभारली होती, असे स्पष्टपणे दाखवलेले आहे.
सर्व दावे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे, तथ्यहिन व मूळ ऐतिहासिक नोंदींशी विसंगत असून हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना "धर्मनिरपेक्ष" (सेक्युलर) दाखवण्याच्या हेतूपुरस्सर प्रयत्नाचे उदाहरण आहे.कोणत्याही अधिकृत बखरींमध्ये, ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये,पेशवाई,इंग्रज वा मुघल काळातील अभिलेखांमध्ये या गोष्टींचा उल्लेख नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे, "तुर्क फौजेत ठेविलीयाने जय कैसा मिळतो" (संदर्भ: शिवकालीन पत्रे) या पत्रावरून स्पष्ट होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुर्क,मुघल,आदिलशाही व निजामशाहीसारख्या परकीय व आक्रमकांना कधीही सोबत घेतले नाही.त्यांच्याशी कोणतीही तडजोड केली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नसतांना ३५ टक्के मुसलमान ही संख्या कुठून काढली ? त्यामुळे अशा खोट्या व भ्रामक माहितीच्या आधारे चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि इतिहासाचा अपमान आहे. तसेच शिवाजी महाराजांवर मुसलमानांचे इतके प्रेम असते, तर पाच मुसलमान पातशाह्यांनी त्यांनी संपवण्याचा चंग बांधला नसता. छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले नसते. सध्याच्या काळातही मुसलमानांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असते,तर नुकतेच्या यवत (ता.दौंड, जि. पुणे) येथे झालेल्या हिंसाचारामध्ये 'सय्यद' नावाच्या धर्माध मुसलमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती. त्यामुळे "खालिद का शिवाजी" हा हिंदूंमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे.
हिंदू जनजागृती समितीच्या मागण्याः
१. या चित्रपटातील वादग्रस्त ऐतिहासिक दाव्यांची तज्ञांमार्फत (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राज्य अभिलेखागार, मान्यताप्राप्त इतिहासतज्ज) शास्त्रशुद्ध पडताळणी करण्यात यावी.
२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याला काल्पनिक संवाद, जबरदस्तीची जातीय समावेशकता किंवा धर्मनिरपेक्षतेच्या हेतूपुरस्सर कथानकात रंगवले असल्यास, ती दृश्ये व संवाद वगळण्यात यावेत.
३. चित्रपटातील सर्व माहिती आणि दृश्ये ऐतिहासिकदृष्ट्या अचूक असल्याचे अधिकृत पुष्टी होईपर्यंत चित्रपटास दाखवण्यास अनुमती देऊ नये.
४. भारतीय संविधानातील अनुच्छेद १९(२) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व इतरांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी मर्यादा आहेत. अशा चित्रपटांतून हेतूपुरस्सर खोटी व तथ्यहिन माहिती देणे हे त्या अधिकारांचे उल्लंघन आहे. पूर्वीही 'पद्मावत' व 'जोधा अकबर' सारख्या चित्रपटांमध्ये अशा प्रकरणांमुळे वाद व जनक्षोभाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
५. नुकतेच "उदयपूर फाइल्स कन्हैय्यालाल टेलर मर्डर" या चित्रपटात सत्यघटनेवर आधारित माहिती दाखवलेली असतांनाही केवळ मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात म्हणून त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम बंदी आणली आहे. त्यातुलनेत तर "खालिद का शिवाजी" या चित्रपटात तर धादांत खोटी व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी माहिती दिलेली आहे. त्यावर तर तात्काळ बंदी आणली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्यांचे विकृतीकरण करणे हे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाथक ठरू शकते व सामाजिक तणाव व जनक्षोभ निर्माण करण्याचा संभव आहे.
'खालिद का शिवाजी' या चित्रपटास अनुमती देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा जनतेच्या श्रद्धेचा विषय असून त्याचे हेतूपुरस्सर विकृतीकरण जनक्षोभ निर्माण होण्यास, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारण ठरू शकते. आपण या प्रकरणी तातडीने यात हस्तक्षेप करून 'खालिद का शिवाजी' या चित्रपटावर तात्काळ बंदी आणावी अशी आमची मागणी आहे.अशा आशयाचे निवेदन चोपडा तहसीलदार यांना देण्यात आले असून निवेदन सादर करते वेळी गजेंद्र जैसवाल,अनिल वानखेडे,दिनेश जाधव,प्रेम घोगरे,यशवंत चौधरी जिग्नेश कंखरे,अनिकेत महाजन, स्वामी मराठे, राहुल चौधरी,राजेंद्र स्वामी,प्रकाश माळी,वृषभ महाजन, सुधाकर चौधरी,गुलसिंग पावरा, अविनाश शिंपी,भूपेंद्र राजपूत,रोहित धनगर,विठ्ठल महाजन,परेश पाटील, रोशन कुंभार,अक्षय लोहार आदी उपस्थित होते.

No comments