वनसंरक्षणातील उत्कृष्ट व धाडसी कार्याची दखल; श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा रजत पदक सन्मान रावेर प्रतिनिधी आदित्...
वनसंरक्षणातील उत्कृष्ट व धाडसी कार्याची दखल; श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा रजत पदक सन्मान
रावेर प्रतिनिधी आदित्य गजरे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाल, ता.रावेर:- महाराष्ट्र वनसेवेत उल्लेखनीय, धाडसी आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत पाल येथील वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांना राज्य शासनाकडून प्रतिष्ठेचा रजत पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाल परिसरासह संपूर्ण रावेर तालुक्यात अभिमान, आनंद आणि गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.आजच्या काळात प्रामाणिकपणे आणि निडरपणे काम करणारे अधिकारी दुर्मिळ मानले जातात; मात्र श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांनी आपल्या कार्यातून ही प्रतिमा बदलून दाखवली आहे. त्या केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर जनतेशी जोडलेली संवेदनशील व्यक्ती म्हणूनही ओळखल्या जात असून, त्यांच्या कामात नेहमीच समाजहिताचा विचार दिसून येतो.श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांनी आपल्या कार्यकाळात वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यंत प्रभावी व दूरदृष्टीपूर्ण उपाययोजना राबवल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाल वनपरिक्षेत्रात अवैध डिंक संकलन, बेकायदेशीर वृक्षतोड व अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून अनेक मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे वनविभागाच्या पथकाने विविध ठिकाणी धाड टाकून लाखो रुपयांच्या वनसंपत्तीची तस्करी रोखली आहे. त्यांच्या या ठोस आणि निर्भीड कारवाईमुळे वनमाफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनसंपत्तीच्या संरक्षणाला नवी बळकटी मिळाली आहे.फक्त कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण जनजागृतीतही मोठे योगदान दिले आहे. ग्रामस्थ, युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी वृक्षारोपण मोहिमा, मार्गदर्शन सत्रे आणि विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले. त्यामुळे वनविभाग आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे.परिसरातील नागरिकांमध्ये सध्या अशा कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, “अशा प्रकारचे प्रामाणिक व जनतेशी जोडलेले अधिकारी प्रत्येक ठिकाणी असायला हवेत” अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास अधिक बळकट झाला आहे.त्यांच्या प्रामाणिक, निडर, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी जोडलेल्या कार्यशैलीमुळेच त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला असून त्या संपूर्ण विभागासाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये शासन सेवेत येण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. दरम्यान, भविष्यातही वनसंपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अधिक जोमाने कार्य करत राहण्याचा निर्धार श्रीमती शीतल नगराळे मॅडम यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments