शिरपूर येथे विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त डॅडी ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.. धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रा...
शिरपूर येथे विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त डॅडी ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न..
धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग (अधिकृत पत्रकार)
मो.8999838651
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर : येथील वीर एकलव्य चौक, वरवाडे येथे विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट रोजी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीश पटेल, भूपेश पटेल, नगराध्यक्ष चिंतन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व आदिवासी गौरव समिती व डॅडी ग्रुपच्या वतीने आदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिरपूर तालुक्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले व पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.
सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन व कार्यक्रमाची सुरुवात वीर एकलव्य चौक वरवाडे येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते सर्व महापुषांचे प्रतिमांना अभिवादन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन विश्व आदिवासी गौरव समिती व डॅडी ग्रुपचे अध्यक्ष सूरज भील यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी केले. व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत असतांना विजय मालचे सर यांनी आदिवासी क्रांतिकारक व आदिवासी समाजाच्या विविध समस्या काय आहेत या बाबत आपले विचार मांडून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील पावरा , प्रमुख मार्गदर्शक दीपक अहिरे हे होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भाषणात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या विविध संधींबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक दीपक अहिरे यांनी समस्त आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना व कार्यक्रमात जमलेल्या जनसमुदायाला सांगितले की आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवावे त्यांना शिक्षण द्यावे विविध क्षेत्रात यश संपादन करून आपल्या आदिवासी समाजाचा विकास साध्य करावा विविध व्यसना पासून दूर राहून आपले आरोग्य व सामाजिक आरोग्य टिकवून ठेवावे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचे विचार त्यांनी केलेले कार्य आचरणात आणावे बाबासाहेबांचे विचार व त्यांचे कार्य हेच एकमेव पर्याय आहेत आणि त्यांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ध्रुवराज वाघ, पवन वाघ, महेंद्र माळी, किशोर गायकवाड, भालेराव माळी, दिनेश सावळे, अशोक सोनवणे, धर्मा मालचे, विकास सोनवणे, राजेंद्र दादा, किशोर ठाकरे, दादा सोनवणे, अनिल पवार, राम सोनवणे, श्याम मोरे, आनंद गांगुर्डे, गुलाब मालचे, रावसाहेब मालचे, देविदास मोरे, बळीराम मोरे, ॲड. दारासिंग पावरा, राकेश पावरा, सुका सोनवणे, रमेश भिल, सोमा भिल, बापू ठाकरे, सुदाम माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी परिश्रम घेणारे डॅडी ग्रुपचे अध्यक्ष सुरज भील, शांताराम सोनवणे सर, संदीप मालचे, अजय भील, सुनील भील, भूपेश पावरा, आकाश पावरा, मिलिंद पावरा, राजू भील, विजय भील, रोहित भिल व इतर पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील तरुण बांधवांनी मेहनत घेतली. डॅडी ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे शिरपूर तालुक्यातील आणि शहर परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शांताराम सोनवणे सर यांनी केले तर या आदिवासी विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे व जमलेल्या जनसमुदायाचे आभार प्रदर्शन श्री गुलाब मालचे यांनी केले

No comments