" शेतकऱ्यांसाठी कही खुशी कही गम तरीही समाधानकारक...एस बी नाना पाटील. कृषी वीज बिल माफी कर्जमाफी सारख्या अटी टाकू नये ही अपेक्षा. एस...
" शेतकऱ्यांसाठी कही खुशी कही गम तरीही समाधानकारक...एस बी नाना पाटील.
कृषी वीज बिल माफी कर्जमाफी सारख्या अटी टाकू नये ही अपेक्षा.
एस बी नाना पाटील.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
शेतकरी कृती समिती ने मागणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३-२४साठी भावांतर योजने साठी मदत मागितली होती त्या ऐवजी एकरी ₹२०००/- ची मदत दिली ती कमी आहे पण हरकत नाही.
कृषी वीज बिल माफी कर्जमाफी सारख्या अटी टाकू नये ही अपेक्षा. महिलांना ₹१५००/- प्रती महिना व तीन गॅस सिलिंडर मिळणे यात " *पात्र* "शब्द वापरल्याने सारे बसतील की नाही हे शंकास्पद आहे ते देखील सरसकट केले असते तर निश्चित आनंद झाला असता.
कृषी सौर ऊर्जा पंपा साठी मागेल त्याला अनुदान जाहीर केले पण लवकर द्यावे ही अपेक्षा.
शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी भावांतर योजना तसेच रासायनिक खते तसेच उत्पादन खर्च कमी करणेसाठी रोजगार हमी योजनेच्या मजुरांना काही दिवस काम अशी कोणतीही ठोस योजना अर्थसंकल्पात नाही.
मुलींसाठी मोफत शिक्षण अभिमानास्पद.
अर्थात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेला अर्थसंकल्प "कही खुशी कही गम"असा आहे.
No comments