Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संसाररूपी रथाला सुरळीत चालवण्यासाठी वर व वधू ही दोन चाके आवश्यक --- शात्री भक्तीस्वरूपदासजी

  संसाररूपी रथाला सुरळीत चालवण्यासाठी वर व  वधू ही दोन चाके  आवश्यक ---                      शात्री भक्तीस्वरूपदासजी इदू पिंजारी- फैजपूर  (...

 संसाररूपी रथाला सुरळीत चालवण्यासाठी वर व  वधू ही दोन चाके  आवश्यक ---                      शात्री भक्तीस्वरूपदासजी


इदू पिंजारी- फैजपूर 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

ज्याप्रमाणे रथाला सुरळीत चालण्यासाठी दोन चाकांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसार रूपी रथाला सुखरूप चालण्यासाठी वधू व वर अशा दोन चाकांची आवश्यकता असते. ते जर योग्य असतील तर त्यांचा संसार सुखाचा होतो असे प्रतिपादन लेवा शुभमंगल संचलित लेवा पाटील समाजाचा वधू वर मेळाव्याच्या  अध्यक्षीय  स्थानावरून गुजरात येथील कोशिंद्रा गुरुकुल चे उपाध्यक्ष  शास्त्री भक्तीस्वरूपदासजी  यांनी प्रतिपादन केले. लेवा शुभमंगल संचलित लेवा पाटीदार समाजाचा वधू वर मेळावा पाडव्याच्या शुभ दिनी आयोजक हर्षल जावळे यांच्या माध्यमातून फैजपुर येथील शुभ दिव्य लॉन येथे पार पडला. या मेळाव्याचे आयोजन हे प्रामुख्याने वधूपक्षास  वरांची व वर पक्षास वधूची माहिती व संपर्क करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात येत असतो.

    या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  सहकार भारती चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ, माजी नगराध्यक्ष पी.के. चौधरी, शिक्षण प्रसारक मंडळ न्हावी चे उपाध्यक्ष अनिल लढे, प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील, महाराष्ट्र लेवा पाटीदार समाजाचे अध्यक्षअरुण बोरोले , माजी पंचायत समिती सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे, सातपुडा विकास मंडळ पाल चे सचिव अजित पाटील  उपस्थित होते.

    सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. आयोजक हर्षल जावळे यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा उद्देश सांगितला. आमदार शिरीष चौधरी,नरेंद्र नारखेडे ,पांडुरंग सराफ, अरुण बोरोले यांनी वधू-वर  यांनी लग्नानंतर  कशा प्रकारे संसार करावा याविषयी आपले मनोगतातून मार्गदर्शन केले. मेळाव्याला परिसरातील अनेक वधू-  वर व पालक उपस्थित होते. मेळाव्यामुळे विवाह संस्थेला विवाह   जुळण्याला नक्कीच गती मिळेल अशी आशा मनोगतातून  मान्यवरांनी व्यक्त केली.मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील आणि सौ. संध्या भोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल भाऊ जावळे, डॉ. व्ही आर चौधरी, कृषी भूषण नारायण( बापू) चौधरी, नरेंद्र चौधरी, विलास चौधरी, तेजपाल चौधरी, मनोज होले व सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित फिरके, हर्षल जावळे यांनी परिश्रम घेतले.

No comments