मुले संस्कारित असतील तरच ते आई-वडिलांना सुख देतात -:- शास्त्री भक्तीस्वरूपदासजी इदु पिंजारी :- फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकवाड) आज प्रथम...
मुले संस्कारित असतील तरच ते आई-वडिलांना सुख देतात -:- शास्त्री भक्तीस्वरूपदासजी
इदु पिंजारी :- फैजपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आज प्रथम दिवशी कथेच्या माध्यमातून गोकर्ण कथा संपन्न झाली.
दिसायला संसार कितीही गोड असला तरी पण ज्या वेळेला आपण कुटुंबामध्ये वावरत असतो त्या वेळेला जर मुलं बाळ संस्कारित असतील तरच आई-वडिलांना ते सुख देत असतात आणि जर संस्कार विहीन मुलं असतील तर ते धुंधुकरी प्रमाणे स्वतःच्या आई-वडिलांना त्रास देत असतात. म्हणून प्रत्येक नागरिकाने जरी दोन पैसे कमी कमविले तरी पण आपल्या येणाऱ्या पिढीला सुसंस्कारीत करून सज्ज करावे.जेणेकरून त्यांचेही जीवन सुखी होणार व आई-वडिलांची जर त्यांनी सेवा केली तर आई-वडील सुद्धा प्रसन्न राहतील. शेवटी स्वतःची सेवा व्हावी अशा स्वार्थ वृत्तीने पण समाजातील गुरुजनांनी व पालकांनी स्वतःची पिढी संस्कारीत करावी असा शुभ संदेश आजच्या कथेच्या माध्यमातून वक्ता श्री शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांनी दिला.
No comments