adds

Page Nav

HIDE
Sunday, July 20

Pages

Subscribe Us

Advertisment

प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिदिन सत्संग करावा -:- श्री भक्ती स्वरूप दास जी

  प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिदिन सत्संग करावा -:- श्री भक्ती स्वरूप दास जी  ईदू पिंजारी फैजपूर -:-  (संपादक  -:-हेमकांत गायकवाड) ...

 प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिदिन सत्संग करावा -:-श्री भक्ती स्वरूप दास जी 


ईदू पिंजारी फैजपूर -:- 

(संपादक  -:-हेमकांत गायकवाड)

 येथून जवळच असलेल्या कोरपावली येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताह कथेच्या द्वितीय दिवशी वक्ता - शास्त्री श्री भक्तीस्वरूपदासजी यांनी भगवान श्रीकृष्ण द्वारा पांडवांसाठी त्यांच्या हक्का चे पाच गाव मागणी  चा संधी प्रस्ताव  हस्तीनापुर धृतराष्ट्राकडे  ठेवला.या कथेच्या माध्यमातून समाजामध्ये सुद्धा जर आपल्या हक्काचं नसेल तर ते आपण कधीही घेऊ नये व दुसऱ्याच्या हक्काचे त्याला परत करावे.भावा भावामध्ये थोड्याफार शेता निमित्त घर दरा निमित्त झगडे होत असतात ते होऊ नये. कारण शेवटी रक्ताची नातीच आपली असतात त्याची जोपासना आपण स्वतःच करायला पाहिजे.जर ते आपण नाही करू शकलो तर भगवान सुद्धा ते मान्य ठेवत नसतो.शेवटी युद्धाच्या माध्यमातून दुर्योधन, दुशासन, कर्ण , शकुनि इत्यादीचा वध झाला म्हणून प्रत्येकाने धर्ममय जीवन जगावे.

            त्यानंतर परीक्षेची कथा सांगत असताना परीक्षिताने एखाद्या साधू महात्म्याचा विनाकारणाने मान सन्मानासाठी अपराध केला.आणि म्हणून त्याला शाप घडला.परंतु शेवटी शुकदेवजी महाराज यांच्या मुखाने कथा श्रवण केली.सत्संग घडला.म्हणून सात दिवसांमध्ये त्याचाही मोक्ष झाला.म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिदिन सत्संग करावा.

         शेवटी ध्रुवचरित्राची सुंदर कथा झाली.त्यामध्ये वेशभूषा सुद्धा सजवण्यात आलेली होती. ते वेशभूषा बघून सर्वांचे मन आनंदित झाले व आकर्षित झाले. त्यामुळे कथेला गर्दी आता हळूहळू वाढू लागली.ध्रुव बाळ जरी लहान असले तरी तो तप करून स्वतः नक्की केलेले स्वतःचे मनोरथ  पूर्ण करू शकला.त्याचप्रमाणे आजची युवा पिढी जर नक्की करेल आणि प्रयत्नशील होणार , कार्यशील होणार.तर कोणतेही कार्य ते करू शकत असतात .म्हणून समाजातील नवयुवकांनी निष्क्रियता, आळस सोडून कामाला लागायला पाहिजे.जेणेकरून स्वतः व स्वतःचा परिवार सुखी होणार असा शुभ संदेश दुसऱ्या दिवसाच्या कथेच्या माध्यमातून वक्ता श्री  भक्तीस्वरूपदासजी यांनी दिला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावदा गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री श्री अनंतप्रकाशदासजी यांनी केले.

No comments

वेळोदे येथे भारतीय बौध्द महासभाच्या वतीने वर्षावास पुष्प 3रे...

भुसावळ येथे कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोह...

रेल्वे भुयारी मार्ग,रस्ता डांबरीकरण,सोलर वीज खांबांसाठी खास...

शेतकरी कर्जमाफी आंदोलन: प्रशांत डिक्कर यांचा तेल्हारा तालुक्...

अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - सपोनि विशाल पाटी...

निलेश राणे यांना सर्व शासकीय कार्यालयात दोन महिन्यासाठी प्रव...

यावल येथे बुधवारी आदिवासी कोळी समाज बांधवाची बैठक

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन ५००० विद्यार्...

हिस्सार गणेश हत्याकांड घडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा भारतीय ...

जातनिहाय जनगणनेसाठी गाव पातळीवर जनजागृती करा - मा. खा.समीर ...