शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांना मुंबई येथे महाराष्ट्र गौरव आणि धर्मयोद्धा पुरस्कार प्रदान ईदू पिंजारी फैजपूर- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ...
शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांना मुंबई येथे महाराष्ट्र गौरव आणि धर्मयोद्धा पुरस्कार प्रदान
ईदू पिंजारी फैजपूर-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
श्री स्वामिनारायण मंदिर भुलेश्वर, मुंबई-२ येथे ५० वर्षांपूर्वी मुलांच्या संस्कारांचे जतन करण्याच्या उद्देशाने बालसंस्कार मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या बालसंस्कार मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने भव्य सुवर्ण महोत्सवाचे आयोजन २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले. हा महोत्सव गिरगाव चौपाटीजवळ भारतीय विद्या भवन येथे पार पडला.
या प्रसंगी संचालक शास्त्री श्री धर्मप्रकाशदासजी यांना सकल हिंदू समाज मुंबई, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन मुंबई, गोरक्षण गौ संरक्षण अभियान, महावीर मिशन ट्रस्ट-हैदराबाद, राजस्थान ३६ कौम यांच्या वतीने *“महाराष्ट्र गौरव”* आणि *“धर्मयोद्धा”* सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांच्या राष्ट्र समर्पण, गोसेवा अभियान, देश-विदेशात धर्मप्रचार, व्यसनमुक्ती आणि धर्मसभा यांसारख्या सामाजिक कार्यांचे कौतुक करण्यासाठी देण्यात आला आहे.
पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत निलेशचंद्रमुनिजी महाराज, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, श्री हार्दिक हुंडिया, मोहनजी माळी, रमेश जैन, चेनाराम प्रजापती, वेलाराम चौधरी, दिनेश जैन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी लक्ष्मीनारायण देव पीठाधीश परमपूज्य १००८आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, महोत्सव प्रमुख श्री भक्तिप्रकाशदासजी, गुरुवर्य श्री धर्मप्रसाददासजी, श्री धर्मस्वरूपदासजी स्वामी, श्री भक्तिस्वरूपदासजी, श्री सूर्यप्रकाशदासजी, श्री आनंदस्वरूपदासजी आणि इतर संत उपस्थित होते. आचार्यश्री एवं संत त्यांनी वक्तव्यामध्ये शास्त्रीजींचे मनभरून अभिवादन केले.
या महोत्सवात मुंबई, सूरत, आनंद, वडोदरा, शिकागो, फिनिक्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई अशा देश-विदेशातील २००० हून अधिक हरिभक्तांनी उपस्थिती दर्शवली.
No comments