जळगांव जिल्हयातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांचे संपादन व पुनवर्सन करण्यासाठी रु.301.37 कोटी च्या खर्चास शासनाची मान्यता मिळणे बाब...
जळगांव जिल्हयातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांचे संपादन व पुनवर्सन करण्यासाठी रु.301.37 कोटी च्या खर्चास शासनाची मान्यता मिळणे बाबत,केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन...
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
हत्तपुर प्रकल्प (उर्ध्व तापी टप्पा क्र1) करीता जळगांव जिल्हयातील रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे मुक्ताईनगर(413 घरे) व रावेर तालुक्यातील मोजे नेहेते (128 घरे) वाघाडी (463 घरे) ऐनपुर(250 घरे), ललभामलवाडी (199 घरे) यांचे संपादन व पुनर्वसन करण्यासाठी अनुक्रमे रु.110 कोटी, रु.24.94 कोटी, रु.100.93 कोटी, रु.39.02 कोटी, रु.26.49 कोटी असे एकूण रु.301.37 कोटी च्या खर्चास शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे बाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळ च्या नियामक मंडळाच्या 67 वी बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली असून,त्याबाबत तत्काळ कार्यवाही होणेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री शमकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदरील प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे कामी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या शिफारसीने मंत्रालयात सादर करण्यात आला आहे.हतनूर प्रकल्पामुळे सतत बॅकवॉटरच्या संपर्काने जमिनी हानीकारक झाल्या असून फुगवट्याच्या पाण्यामुळे घरात सत्तत ओल असल्याने व विषारी जिवाणूंचा त्रास होत असल्याने, तसेच पाण्यामुळे जमिनीची झीज होत असल्याने या गावांच्या घरांचे संपादन व पुनर्वसन होणे अत्यंत आवश्यक असल्याबाबत यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी निवेदनात सांगितले आहे.
त्यानुषंगाने सदर प्रस्तावांना जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळ च्या बैठकीत मान्यता प्राप्त झालेली असून,सदर प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या मान्यतेस सादर करण्यात आलेला आहे.तरी सदर प्रस्तावास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांच्या स्तरावरून मंजुरी द्यावी अशी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी विनंती केली आहे.
No comments