Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पैसा योग्य प्रकारे फिरला तर रोजगार निर्माण होतो :- अरुणभाई गुजराथी

  पैसा योग्य प्रकारे फिरला तर रोजगार निर्माण होतो :-  अरुणभाई गुजराथी चोपडा : प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) चोपडा बँकेला ८६ वर्षांची...

 पैसा योग्य प्रकारे फिरला तर रोजगार निर्माण होतो :- अरुणभाई गुजराथी




चोपडा : प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा बँकेला ८६ वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. बँकिंगमध्ये ठेवीदारांप्रमाणे प्रामाणिक कर्जदार महत्वाचे असतात. पैसा योग्य प्रकारे फिरला तर रोजगार निर्माण होतात. संसार उभे रहातात. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानावर असून सहकारात मानवतावाद महत्वाचा आहे. कारण त्यातूनच माणूस उभा राहतो. सहकाराला पर्याय नाही असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले. ते चोपडा बँकेच्या नाशिक शाखा उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

दि. चोपडा पीपल्स को ऑप -बँकेच्या नाशिक शाखेचा उद्घाटन सोहळा काल आयोजित करण्यात आला. भोळे मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. प्रमुख पाहुणे व उद्घाटक माजी मंत्री आ. अनिल पाटील तसेच आ. सीमा हिरे, माजी आ. नितीन भोसले, शैलेश कुटे, केशवराव पाटील, राज्य अर्बन बँक फेडरेशन अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, संचालक नानासाहेब सोनवणे, रत्नाकर कदम, जिल्हा बँक असोसिएशन अध्यक्ष हिरालाल सुराणा व् मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. खान्देशातील बँक नाशिक महानगरीत दाखल झाली आहे. चांगला प्रतिसाद मिळेल. चोपडा परिसरातील ५ लाख लोकांची वस्ती या सिडको भागात आहे. पहिल्याच दिवशी ५ कोटींच्या ठेवी मिळाल्या असून येत्या दोन वर्षात कोट्यवधींच्या ठेवी मिळतील. त्यामुळे बँक वृध्दींगत होईल हा विश्वास वाटतो असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष सुनीलकुमार जैन यांनी स्वागत केले. अरुणभाई गुजराथी म्हणाले, बँकिंग क्षेत्र अडचणीत असून ठेवी ठेवणारे भरपूर असतात. मात्र प्रामाणिकपणे कर्ज घेऊन ते फेडणारे खूप कमी आहेत. माणसाच्या आणि संस्थांच्याही जीवनात चारित्र्य व दायित्व महत्वाचे आहे. दानाचे मोल आहेच पण त्यापेक्षा रोजगार मिळवून देणे महत्वाचे असते. चोपडा बँकेने रोजगारनिर्मितीला चालना द्यावी असा सल्ला त्यांनी दिला. आ. अनिल पाटील यांनी बँकेच्या विस्तारा इतकीच विश्वासार्हता जपली पाहिजे याकडे लक्ष वेधले. चोपड्याशी आपले ऋणानुबंध असून ते या बँकेने मला वैयक्तिक दिलेल्या कर्जाने दृढ झाल्याचे नमूद केले. संचालक मंडळ सदस्य अशोक अग्रवाल, डॉ. सुभाष देसाई, प्रा.डॉ.आशिष गुजराथी, सुनील गुजराथी, कैलास जैन, पवन गुजराथी, डॉ. नरेंद्र शिरसाट, डॉ. सुधाकर पाटील, राजश्री गुजराथी, वैशाली गुजराथी, ऋषी गुजराथी, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश परांजपे, व्यवस्थापक किशोर गुजराथी तसेच सल्लागार मंडळ सदस्य शैलेश सुगंधी, प्रसाद आंबेकर, सतीश गुजर, नितीन चौधरी, राजेश कोठावदे, संतोष घिया, ज्ञानेश्वर पाटील, प्रविण जोशी आदी उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. सायली आचार्य यांनी केले. नेमीचंद जैन यांनी आभार मानले.

No comments