शेतकी संघाच्या रेशन लाभार्थ्याचा पाचव्या दिवशीही संताप अधिकाऱ्याचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष;दोन महिन्याच्या माल न देता पावत्या वाटप....! च...
शेतकी संघाच्या रेशन लाभार्थ्याचा पाचव्या दिवशीही संताप
अधिकाऱ्याचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष;दोन महिन्याच्या माल न देता पावत्या वाटप....!
चोपडा (प्रतिनिधी)-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शासनाचा धोरणा नुसार सामान्य जनते पर्यंत शासकीय योजना पोहचायला हव्या असे धोरण असतांना चोपडा शेतकी संघाच्या रेशन लाभार्थ्याचा पाचव्या दिवशीही संताप अनावर झाला आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याबाबत जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
चोपडा तालुक्यात सगळीकडे रेशन वितरण लाभार्थ्यांपर्यंत गावोगावी दर महिन्याला रेशन सुरळीत पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे मात्र चोपडा शेतकी संघाच्या दुकानांची तक्रार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच रेशन लाभार्थ्यानी गोंधळ घालत आपल्या हक्काचे रेशन माल मिळावा यासाठी मागणी केली होती.प्रजासत्ताक दिनाच्या कारण सांगत अधिकाऱ्यानी
सामान्य जनतेच्या प्रश्नांना कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र आज पाचवा दिवस उलटूनही रेशन लाभार्थ्यांना रेशन मिळत नसल्याचे सामान्य जनतेतुन संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. चोपडा शेती संघाकडे रेशन वितरणाचे एकूण चार दुकाने आहेत. या चारही दुकानांच्या रेशन माल गोडाऊन मधून नियमितपणे उचलला जातो. मात्र रेशन लाभधारकांना या मालाचे दर महिन्याला वितरण न करता त्यांना वेटिंगची पावती अनाधिकृत रित्या दिली जाते. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून रेशन लाभार्थ्यांना रेशनचा माल वितरित करण्यात आला नसल्याने दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सुमारे ३०० ग्राहकांनी आपला संताप व्यक्त करीत शेतकी संघाचे ध्वजारोहण करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती.मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यानी प्रजासत्ताक दिनाचा कारण सांगत ह्या रेशन दुकानाकडे दुर्लक्ष केले.परंतु खरे प्रजासत्ताक दिन साजरा करणे म्हणजे सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे होय.परंतु वरीष्ठ अधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे नाव सांगून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची
संतप्त प्रतिक्रिया रेशन लाभार्थ्यानी दिली.
शेतकी संघात रेशन घेण्यासाठी लाभार्थी पहाटे तीन ते चार वाजे पासून नंबर लावत असतात आणि रेशन वाटप करणारे "महाशय" सकाळी आठ ते नऊ वाजता येत असतात आणि १० ते २० लोकांना रेशन वाटप झाले की, थम्स घेणारे मशीन खराब तर माल संपला असे विविध कारण सांगत रेशन दुकान बंद केली जाते. पहाटे पासून आणि रोजभाग बुडवून आलेले सामान्य जनता मात्र निराश होऊन घरी जात असते तसेच दुसऱ्या दिवशी आपला नंबर लावण्यासाठी परत पहाटे उठून रेशन घेण्यासाठी येत असतात. असे सलग पाच दिवश होऊन देखील वरीष्ठ अधिकारी सुस्त आहेत. सामान्य जनता तक्रार करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले की, तिथे कोणीही अधिकारी भेटू देत नाही अशी सुध्दा संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. एकाच ठिकाणी चार चार रेशन दुकाने कश्या? दिवाळीच्या किटच्या पावत्या अजूनही लोकांकडे आहेत.जवळपास दोन ते तीन महिन्याच्या सट्टावाल्या सारख्या पावत्या दिल्या जातात त्यावर तारख्येचा कोणताही उल्लेख नसतो.माल दर महिन्याला का दिला जात नाही? शेतकी संघाचे मॅनेजर व संचालक मंडळ या रेशन वाटपाचे मासिक बैठकीत आवक जावक चे रजिस्टर चेक करतात की नाही? रेशन माल लोकांना वितरित न करता सदर माल कोठे गेला? कोणाच्या घशात गेला? याकडे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष का होत आहे? न वाटप केलेल्या मालाचे लाभार्थी कोण-कोण? याबाबत जिल्हाधिकारीनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.तसेच संबंधित लाभार्थी जो कोणी असेल त्यांचा कडून वसुली व्हावी व गुन्हा देखील दाखल व्हावे व पाठराखण करणारा संबंधित अधिकाऱ्याची देखील चौकशी करावी अशी मागणी होत आहे
No comments