सावदा येथे वक्फ कायद्या विरोधात जनजागृती सभा. समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थिती इदू पिंजारी फैजपूर/मुबारक तडवी रावेर (संपादक -:-...
सावदा येथे वक्फ कायद्या विरोधात जनजागृती सभा.
समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थिती
इदू पिंजारी फैजपूर/मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार..सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सावदा येथे वक्फ कायद्या विरोधात जनजागृती सभा.
समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थिती केला केला कायद्याचा विरोध देशात सर्वात चर्चेत असलेला वक्फ बिल हा लोकसभा व राज्यसभेमध्ये मंजूर झाल्या नंतर देशाच्या राष्ट्रपती यांच्या सही स्वाक्षरी नंतर ह्या बिलाचा कायद्यात रूपांतर झाला असून हा कायदा मुस्लिम विरोधी असल्याचा तसेच आमच्या हक्काची जागा व वक्फ (दान) केलेली जागा वर गदा आणणारा आहे. सदरहून कायदा संविधानाच्या मूळ चौकटीत येणाऱ्या कलम १४,२१,२४,२५,२६,२६ ब च्या विरोधात व त्याचे उल्लंघन करणारा आहे,या संदर्भात सावदा येथे जोहरा हॉल मध्ये सावदा - फैजपूर च्या सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख व प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वक्फ कायदा २०२५ म्हणजे (उम्मीद) या कायद्याचे संविधानिक पद्धतीने रस्त्यावर उतरून विरोध करणे असे आहे.या मध्ये प्रमुखांनी या विषयी संविधानिक दृष्टीकोनाने आपापले मनोगत व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगाव येथील अयाज अली हे होते.प्रथम यावल येथील खलील अहेमद यांनी सांगितले की मुस्लिम समाजाने आपल्या मुलांना उत्तम दर्जाचा शिक्षण द्या, जेणे करून त्यांना पुढील वाढचालीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याच प्रमाणे डॉ.रागीब अहेमद यांनी सांगितले की सरकारने लोकशाहीचे चारही स्तंभात घुसखोरी केल्याचे चित्र दिसत आहे,लोकसभेत ह्या बिलाचा २३२ खासदारांनी विरोध केला ज्या मूळ सर्वांना हे कळाले की देशातील मोठा भाग हा,ह्या वक्फ कायद्या विरोधात आहे, तसेच वक्फ कायदा हा संविधानाच्या २१,२५, २६ब, व १४ च्या विरोधात असल्याचे ही त्यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले त्याच प्रमाणे सोहेल आमिर यांनी आपल्या मार्गदर्शनावेळी सांगितले की २०१४ नंतर देशात अशांती प्रसरली तसेच देश हा कमजोर झाल्याचे चित्र दिसून आले,शासन देशात शांततेत राहणारे हिंदू मुस्लिम मध्येया नंतर जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते मुफ्ती हारून नदवी यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला असून ते बोलले की मुस्लिम समाजाने संविधानिक पद्धतीने या अन्याय कारक कायद्याचा विरोध करावा. संविधानाने आपल्याला प्रत्येक नागरिकांना स्वतंत्र पाने राहण्याची तसेच आपल्या अधिकाराची पाठराखण करण्याचा अधिकार दिला असून सरकार मुस्लिमांना दाबण्याचा पर्यंत करीत असून आम्ही जर रस्त्यावर आले तर सरकारची झोप उडेल व आम्हा शांततेच्या मार्गावर चालणाऱ्यांना चिडून नये असा थेट इशारा त्यांनी सरकार ला दिला आहे.या नंतर जळगाव जिल्ह्यातील इकरा एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष तसेच कायद्याचे अभ्यासक व दूरदृष्कोण असणारे डॉ अब्दुल करीम सालार यांनी या विषयी या बिलात फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाच्या छळ करण्याचा प्रकार असून सरकार सोशल मीडिया व मिडिया च्या माध्यमातून फेक निरेटव्ह पसरवण्याचा पर्यंत करून आहे,की देशात आर्मी तसेच व रेल्वेच्या नंतर वक्फ बोर्डाच्या अधीन सर्वात जास्त जागा आहे अशी चुकीची माहिती पसरवली गेली आहे,वास्तविक दर्शन भरपूर मंदिर ट्रस्ट अशा आहे ज्यांच्या कडे वक्फ पेक्षा जास्त जागा आहेत.पण सरकार फक्त मुस्लिमांना व त्यांच्या अधिकारांना हुकूमशाही पद्धत चे उद्धवस्त करण्याचा काम करीत आहे.राजा महाराज च्या काळात भरपूर जागा ही वक्फ करण्यात आली असून सदरच्या कायद्याविरुद्ध फक्त मुस्लिमच नसून हिंदू बांधव सुद्धा आहेत हे लोकसभेत सिद्ध झाले आहे.या विषयी सर्वोच्च न्यायालयात भरपूर याचिके दाखल झाल्या असून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनेक प्रश्न विचारून जबविचारले आहेत.कोणतीही संस्था असली तर त्या मध्ये निवडणुका होतात हा लोकशाहीचा भाग असून सरकारने यात नियुक्त्या करू असे नवीन तरतुदीत म्हटले आहे.हा प्रकार असंवैधानिक असून हा कायदा मुस्लिम समाजावर अन्याय कारक आहे, संविधानाचे कलम १४ अंतर्गत सर्व समान असून कायदा सर्व संस्थांसाठी का नाही असे ही डॉ करीम सलार यांनी सरकार च्या नीतीवर प्रश्न निर्माण केले आहे.या नंतर भीम आर्मीचे रमाकांत तायडे यांनी ही या कायद्याचा विरोध आपल्या भाषणातून दर्शवला तसेच शेवटी अयाज अली यांनी आपल्या शेवटच्या अध्यक्षी भाषणात सांगितले की हा काळा कायदा मुस्लिम विरोधी असून एक षडयंत्र आहे.वक्फ ची एक एक इंच जागा ही फक्त मुस्लिमांचीच असून सरकारचा यात हस्तक्षेप कदापी सहन करणार नाही व दडपशाही खपून घेतली जाणार नाही हे सरकारने लक्षात असूद्यवी.सरकार जर हा कायदा परत घेतला नाही तर पूर्ण ताकदीने संपूर्ण देशातील नागरिक हे रस्त्यावर उतरतील असा थेट इशारा त्यांनी सरकार दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर मुस्तफा आबादी यांनी केले तर आभार हे सय्यद जावेद यांनी मानले आहे.
जनाब हारून मुफ्ती साहेब सोहेल अमीर साहेब डॉ. रागिब साहेब करीम सालार साहेब कार्यक्रमाचा आयोजन चे नियोजन माजी उपनगराध्यक्ष कुर्बान मेंबर यांनी केले यावेळी असगर दादा इरफान मेंबर जाविद जनाब डॉ हाजी हारून शेठ हाजी रफिक शेठ कलीम मेंबर जफर मेंबर फिरोज खान मेंबर रियाज मेंबर अनवर खाटिक गुड्डू मेंबर आणि सर्व कौमी एकता फाउंडेशन सदस्य यांनी केला.
No comments