माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) _मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं_ _गु...
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
_मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं_
_गुलाब जाईजुई मोगरा फुलवीत_
हे जुने शेतकरी गीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. जे करूण रसाने ओथंबून गेले आहे.आजही मोबाईल युट्यूबवर, आकाशवाणीच्या संगीतातील कार्यक्रमात सादर केले जाते.श्रमिक, शेतकरी,शेतमजूर कामातील श्रम विसरण्यासाठी ऐकून आनंद घेताना दिसतात. रबी हंगामातील कष्टकरी जीवनावर आधारित शेतमळ्यातील बळीराजाची श्रमसंस्कृती आणि लळा ही बाब गीतातून अधोरेखित होते. रबी हंगामात मळ्यातील पीकांच्या वाढिसाठी पाटाचं सावकाश वाहणारे नितळगार पाणी पुर्ण पीकातील माती भीजवते तसेच शेतमळ्यातील काठावर लावलेली फुलं झाडे गुलाब,जाई, जुई मोगरा यांना जोर येऊन फुलांना बहर येतो.
_दादाच्या मळ्यामंदी मोटचं मोटं पानी_
_पाजिते रान सारं मायेची वयनी_
_हसत डुलत मोत्याचं पीक येतं_
ग्रामीण आदिवासी भागातील शेतकरी, कष्टकरी जीवनात नाते संबंधातील प्रत्येक घटकाला गीतातून स्पर्श केला आहे.दादा म्हणजे मोठा (भाऊ) जो शेतीचा मालक आहे. पुर्वी शेतंमळ्याला पाणी देण्यासाठी मोटं वापरली जात होती. हे सर्व काम भावाची बाई (वयनी) अतिशय कष्टाळू अंतःकरणाने पुर्ण मळ्यात पीकांच्या वाढिसाठी पोटच्या लेकराला जशी माया द्यावी तशी काळजीपूर्वक काम करीत असते.त्यामुळे फुललेल्या शेतमळ्यातील जोंधळा जणू हवेशीर डोलतांना हसत डुलत आहे याचा आनंद वाटला आहे.
_लाडकी लेक राजाचा ल्योक_
_लगीन माझ्या चिमनीचं_
या गीतातून कोवळ्या उन्हातील हिरवेगार शेतपीकाप्रमाणे कोवळ्या वयात खुलून दिसणारी सुंदर मुलगी ही परक्या घरातील राज्य चालवणाऱ्या लोकांची होणार ती आता लग्नाच्या वयात आली आहे. याचा तीच्या वडलांना आनंद होतो.
_सावळा बंधुराया, साजिरी_ _वयनीबाई_
_गोजिरी शिरपा-हौसा म्हायेरी माज्या_ _हाई_
_वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं_
सावळा बंधु म्हणजे काम कष्ट करून काळा,सावळा रंग परिधान केलेला पेहराव त्याचा मातीशी सबंध येतो साजिरी वयनीबाई म्हणजे नेहमिच सुंदर दिसणारी (गोजिरी)भावाचं बक्कळ प्रेम माहेरी भेटत असत त्यामुळे कधीही माहेरच्या वाटेकडे ओढावलेलं मन लागलेलंच असतं
_गडनी सजनी गडनी सजनी गडनी गं_
गडनी सजनी ( सोबती साथीदार) बरोबर असावा बहिणीला असे वाटते
_राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं_
_नजर काढू कशी जिवाचं लिंबलोण_
_मायेला पूर येतो,पारुच मन गातं_
या शेतकरी गीतांमधून बहिनीचे भावाबदलचे प्रेम,आपुलकी आणि बंधुभाव यांचा साक्षात्कार दिसून येतो श्रम संस्कृतीवर आधारित शेतमळ्यातील मातीत राबून कष्ट घेतले तर कष्टाचे चिज होऊन आणि मातीतून सोनं(धान्य) तयार होते.परंतु त्यासाठी जिवाचं रान करून शरीराला घाम येईपर्यंत मेहनत झाली पाहिजे हे पाहून आईच्या आनंद अश्रू अनावर येतात पारू हे मुलीचं नाव आहे. जीने शेती मातीत राबणाऱ्या भावा बदल आणि वयनी (भावजयी) बद्दल नाते संबंधातील जिव्हाळा निर्माण करून श्रम संस्कृतीला महत्त्व दिले आहे.अशी माहिती आदिवासी संस्कृती संवर्धक अभ्यासक सुभाष कामडी यांनी दिली आहे.

No comments