"सातबारा त किरकोळ दुरुस्तीसाठी हजारो शेतकरी फिरत आहेत वणवण जिल्हाधिकाऱ्यांनी ते सोपे केल्यास जे डी सी सी कर्ज वाटप व व्याजमाफी मिळेल ...
"सातबारा त किरकोळ दुरुस्तीसाठी हजारो शेतकरी फिरत आहेत वणवण जिल्हाधिकाऱ्यांनी ते सोपे केल्यास जे डी सी सी कर्ज वाटप व व्याजमाफी मिळेल यासाठी एस बी पाटील यांनी दिले निवेदन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
......जळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नाव/आडनाव मध्ये किरकोळ बदल उदा:- माळी सातबारा उताऱ्यावर असेल तर आधार वर महाजन आहे, काही शेतकऱ्यांचे नावात राव ,कुमार, बाई असे किरकोळ बदल असल्याने राज्य सरकार/केंद्र सरकार ने मागील काळातील व्याज माफीचा फायदा न दिल्याने, जे डी सी सी बँकेचे मागील वर्षांचे ३०कोटी व्याजाचे सरकार कडे घेणे असल्याने यावर्षी त्या शेतकऱ्यांना व्याज माफीचा फायदा मिळाला नाहीव नवीन कर्ज देखील नाही.
कायद्याने जे योग्य आहे ते झालेच पाहिजे पण नावातील/आडनावातील बदल राजपत्रात प्रसिद्ध करून घेतल्यावर सातबारा वर दुरुस्ती साठी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी पद्धत असल्याने महिने vheखूप वेळ जात आहे.
तलाठी कडे दिल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी कागदपत्र तपासून शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून घेऊन तहसीलदार यांनी ते मंजूर केल्यास एका आठवड्यात त्याला योग्य तो दाखला मिळू शकेल.
सध्याची तहसील कार्यालयात अर्ज मग सुनावणी पुन्हा चौकशी या मुळे खूप वेळ जातो.त्यासाठी जिल्हास्तरावरून एक कार्यपद्धती ठरवून दिली तर शेतकऱ्यांची मदत होईल अशी विनंती शेतकरी कृती समितीच्या वतीने एस बी पाटील, डॉ रवींद्र निकम, डॉ फारुक शेख,भागवत महाजन,चंद्रकांत पाटील,अजित पाटील यांनी केली आहे.
No comments