Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयत अहिल्याबाई होळकर यांची त्री शताब्दी जयंती व श्री संत मुक्ताबाई यांची ७२८ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

  ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयत अहिल्याबाई होळकर यांची त्री शताब्दी जयंती व श्री संत मुक्ताबाई यांची ७२८ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन क...

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयत अहिल्याबाई होळकर यांची त्री शताब्दी जयंती व श्री संत मुक्ताबाई यांची ७२८ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली येथील ज्ञानदेव सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती व श्री संत मुक्ताबाई यांच्या ७२८ व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष भोईसर,मुख्य अतिथी द्रविडजी मोरे(मध्य प्रदेश सरकार कॅबिनेट मंत्री दर्जा),पोलीस पाटील किशोर मेढे,माजी प्राचार्य चव्हाण सर,ज्ञानोदय मंडळाचे संचालक रवींद्र महाजन,अंतुर्ली पोलीस स्टेशनचे जमादार अशोक जाधव,रत्नाताई कुलकर्णी,शोभाताई महाजन,वंदनाताई देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात श्री संत मुक्ताबाई व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.याप्रसंगी वाचनालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते महिला व बंधू भगिनी,वाचक यांनी विविध ग्रंथांचे वाचन केले. अध्यक्ष अध्यक्षएस.ए.भोईसर व कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले द्रविन जी मोरे यांनी अहिल्याबाई होळकर व श्री संत मुक्ताबाई यांचे जीवनपटावर माहिती दिली.अहिल्याबाई होळकर या महादेवाच्या भक्त होत्या त्यांनी ठीक ठिकाणी नदीवर घाट बांधले त्याचप्रमाणे इंदोर पासून हैदराबाद पर्यंत दर कोसावर पाय विहिरी बांधल्या त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी सैन्य व वाटसरू साठी विश्रांतीसाठी त्यांनी धर्मशाळा ही बांधल्या होत्या.त्या ठिकाणी आज अंतुर्लीची ग्रामपंचायत आहे.अंतुर्ली येथे ऐतिहासिक अशी आजही पाय विहीर आहे तिच्या दीडशे पायऱ्या आजही आहेत त्या पाय विहिरीवरून अंतुर्ली गावाला पाणीपुरवठा होत होता त्या काळात अहिल्या बाईंनी अंतुर्ली  वसवले अंतुर्ली येथे श्रीराम मंदिरात महादेवाचे मंदिर २५० वर्षांपूर्वीचे आजही चांगल्या सुस्थितीत आहे नक्षीकाम,रंगकाम आजही जसेच्या तसे आहे.त्यांनी अंतुर्ली येथील सूर्यपुत्री तापी नदीवर घाट बांधला होता.तो पाण्यामध्ये आहे.कार्यक्रमास भाऊराव महाजन,पत्रकार विनायक वाडेकर,लताताई मेढे,कल्पना बंडू बावस्कर,हितेंद्र डागा,रवींद्र सोनवणे,चुनीलाल सोनवणे,भास्करराव सोनवणे,श्रीनिवास पाटील,वसंत पंढरी पाटील,प्रभाकर महाजन,ग्रंथपाल मधुकर वानखडे अनिल नावकर,शांताराम महाजन,गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर व वाचक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि.डी.बारी सर व आभार प्रदर्शन अनिल वाडीले यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

No comments