पृथ्वी वाचवा, मानवी सृष्टी टिकवा"; पाडळसा येथे जागतिक वसुंधरा दिनी कायदेविषयक जनजागृती भरत कोळी यावल प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गाय...
पृथ्वी वाचवा, मानवी सृष्टी टिकवा"; पाडळसा येथे जागतिक वसुंधरा दिनी कायदेविषयक जनजागृती
भरत कोळी यावल प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
निसर्ग मानवाला सर्वकाही मोफत आणि उच्च दर्जाचे देतो, मात्र मानवाच्या वाढत्या स्वार्थामुळे निसर्गाचे शोषण होत आहे. जर आपण वेळीच जागरूक होऊन पृथ्वीचे रक्षण केले नाही, तर संपूर्ण मानव सृष्टीचा अंत अटळ आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते श्री. शशिकांत वारूळकर यांनी केले.
तालुक्यातील पाडळसा येथील लोक विद्यालय, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात 'जागतिक वसुंधरा दिना' निमित्त आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात ते बोलत होते. हे शिबिर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. हे शिबिर तालुका विधी सेवा समिती यावल तसेच यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. यंदाच्या वसुंधरा दिनानिमित्त "आपली शक्ती, आपला ग्रह" ही संकल्पना (थीम) राबवण्यात आली.
निसर्ग संरक्षणाची गरज
आपल्या मार्गदर्शनात वारूळकर पुढे म्हणाले की, "आज भूमी, जल आणि वायू प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आपली पृथ्वी हीच आपली खरी शक्ती आहे. या शक्तीचे संगोपन आणि सुयोग्य वापर करणे मानवी जीवनाच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी अनिवार्य आहे. वसुंधरा टिकली तरच माणूस वाचेल, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कृतीतून निसर्ग रक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे."
उपस्थित आणि मान्यवर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री. बऱ्हाटे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक श्री. पवार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि त्यासंबंधित कायद्यांविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली आहे...

No comments