धोंडखेडा गावात बुद्ध पौर्णिमेचा प्रेरणादायी उत्सव महिलांच्या खीर दानातून समाजजागृतीचा नवा संदेश. जिल्हा प्रतिनिधी: - आदित्य गजरे (संपादक -...
धोंडखेडा गावात बुद्ध पौर्णिमेचा प्रेरणादायी उत्सव महिलांच्या खीर दानातून समाजजागृतीचा नवा संदेश.
जिल्हा प्रतिनिधी: - आदित्य गजरे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धोंडखेडा (ता. बोदवळ धोंडखेडा गावामध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात, श्रद्धेने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार करत समता, बंधुता आणि करुणा या मूल्यांचा जागर या कार्यक्रमातून करण्यात आला.या निमित्ताने गावातील महिलांनी एकत्र येत खऱ्या अर्थाने समाजासाठी आदर्श निर्माण केला. त्यांनी स्वखर्चाने खीर दान वाटप करून गावातील सर्व घटकांपर्यंत प्रेम, एकता आणि माणुसकीचा संदेश पोहोचवला. या उपक्रमात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना समानतेने प्रसाद देण्यात आला, ज्यामुळे गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.या उपक्रमात वैशाली सुरवाडे, शोभाबाई सुरवाडे, बेबाबाई सपकाळे, मोहिनी सुरळकर, आरती सुरडकर यांची सक्रिय उपस्थिती होती. महिलांनी घेतलेली पुढाकार आणि त्यांचे सामाजिक भान हे गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे.आजच्या काळात अनेक ठिकाणी समाज अजूनही अंधश्रद्धा, भेदभाव आणि निष्क्रियतेच्या विळख्यात अडकलेला दिसतो. मात्र धोंडखेडा गावातील हा उपक्रम झोपलेल्या समाजाला जागवणारा आहे. बुद्धांच्या शिकवणीतून “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
महिलांनी केलेल्या या कार्यातून हे स्पष्ट झाले की, समाज बदलण्यासाठी मोठ्या पदांची किंवा सत्तेची गरज नसते, तर फक्त चांगल्या विचारांची आणि कृतीची गरज असते. जर प्रत्येक गावात अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले, तर समाजातील अज्ञान, अन्याय आणि भेदभाव हळूहळू नष्ट होऊन एक प्रगत, जागृत आणि सशक्त समाज निर्माण होऊ शकतो. धोंडखेडा गावातील हा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श ठरावा, आणि प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी काहीतरी योगदान देत बुद्धांच्या विचारांचा प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments