adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य! बहुजन विकास आघाडीच्या रूचिता नाईक यांची महापौर अजीव पाटील साहेबांकडे मागणी...

  वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य! बहुजन विकास आघाडीच्...

  वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य!

बहुजन विकास आघाडीच्या रूचिता नाईक यांची महापौर अजीव पाटील साहेबांकडे मागणी...


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नालासोपारा:- लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुर साहेब, युवा आमदार क्षितीज दादा ठाकुर, उपमहापौर मार्शल लोपीस साहेब व जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधु) यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीच्या रूचिता नाईक यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील साहेब यांची भेट घेऊन नागरिकांच्या विविध महत्त्वाच्या समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले. या भेटीदरम्यान वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, बस स्थानके, सार्वजनिक उद्याने तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा लाभ होईल. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवासादरम्यान तसेच विविध शासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने सुलभपणे पूर्ण करता येतील यासंदर्भात महापौर साहेबांनी मागणी मान्य करत लवकरच काम पूर्णत्वास होईल असे आश्वासन देण्यात आले.

तसेच नालासोपारा बस डेपोपासून वसई तहसीलदार कार्यालयापर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याबाबत पूर्वी करण्यात आलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. ही बस सेवा सुरू झाल्यास नालासोपारा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय सोपारा गावातील जामा मस्जिद परिसरातील अरुंद नाल्याची रुंदी वाढवून त्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली. पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये तसेच मशिदीत पाणी शिरण्याची समस्या निर्माण होते. नाल्याची रुंदी वाढविल्यास पूरस्थिती टाळण्यास मदत होईल व नागरिकांना दिलासा मिळेल. या तीनही महत्त्वाच्या विषयांवर महापौरांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रूचिता नाईक, दानिश करारी, महेश निकम, जया गुप्ता उपस्थित होते.

No comments