शासनाने रखडलेला पीकवीमा त्वरित दयावा, प्रहार चे संदीप ताथोड यांची मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शासनाने रखडलेल...
शासनाने रखडलेला पीकवीमा त्वरित दयावा, प्रहार चे संदीप ताथोड यांची मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासनाने रखडलेला खरीप हंगामातील २०२४ मधील सोयाबीन या पीकांचा वीमा त्वरित दयावा ही मागणी प्रहार अपंग संघटना अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप गजानन ताथोड यांनी केली आहे, शासनाने २५ टक्के पीकवीमा रकम शेतकरी यांना दिली आहे, बाकी असलेली ७५ टक्के रक्कम द्यावी, कारण शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला आहे ,कारण या वर्षी उशिरा चालु झालेला पावसाऴा त्यातच बरेच शेतकरी यांनी दुबार पेरणी केली, आणि आता पाऊसाने मारलेली दांडी यामुऴे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे तरी शासनाने रखडलेला पीकविमा चा मार्ग मोकऴा करावा ही मागणी शेतकरी करीत आहेत
No comments