जिल्हाधिकाऱ्यांनी ई-मेल तक्रारीची घेतली दखल; जन्म-मृत्यू विभागाची लवकरच चौकशी यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल पंचायत सम...
जिल्हाधिकाऱ्यांनी ई-मेल तक्रारीची घेतली दखल; जन्म-मृत्यू विभागाची लवकरच चौकशी
यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल पंचायत समितीतील जन्म-मृत्यू दाखला प्रकरणाची चौकशी होणार जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी ई-मेलद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेतल्याने यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू विभागाच्या कामकाजाची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. जन्म-मृत्यू दाखले देण्याच्या प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी तसेच कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतल्याने नागरिकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रकरणाची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शब्बीर खान यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतल्याबद्दल निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. चौकशी निष्पक्षपणे होऊन नागरिकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

No comments